AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नातेवाईकाकडे हवापालटासाठी आला, अन् चक्क 3 कोटींचा मालक बनला, कसं काय ?

देव देतो तर छप्पर फाडके देतो असा प्रत्यय एका नागरिकाला आला आहे. दिवाळीच्या सुट्टी निमित्त आपल्या नातेवाईकाकडे राहायला गेलेल्या या व्यक्तीने सहज पाचशे रुपयाचे तिकीट खरेदी केले आणि् त्याला ही लॉटरी लागल्याने त्याचे नशीबच पालटले आहे.

नातेवाईकाकडे हवापालटासाठी आला, अन् चक्क 3 कोटींचा मालक बनला, कसं काय ?
प्रतिकात्मक फोटो ( AI )
| Updated on: Nov 13, 2024 | 1:38 PM
Share

माणसाचं नशीब कधी त्याला कधी साथ देईल हे सांगता येत नाही. असाच एक किस्सा एका व्यक्तीबाबत घडला आहे. तो आपल्या नातेवाईकाकडे सुट्टी निमित्त हवापालट करण्यासाठी गेला होता. आणि तेथे त्याने 500 रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले. या तिकीटाने त्याच्या नशीबाचे दार उघडले. काय आहे हा प्रकार पाहा….

दिल्लीचे निवासी लव कुमार यांना ही दिवाळी कायम लक्षात राहील अशी आहे. कारण या दिवाळीने त्यांच्यावर छप्पर फाडके पैशाची बरसात झाली आहे. आपल्या नातेवाईकाकडे राहायला गेलेल्या लव कुमार याने 500 रुपयाचे लॉटरीचं तिकीट काढले होते. या लॉटरीचा तीन कोटीचं बक्षिस त्याला लागले आहे. लॉटरीचे तिकीट जिंकल्यानंतर प्रतिक्रीया देताना ते म्हणाले की हे मला लागलेले पहिले लॉटरीचे बक्षिस आहे. या बक्षिसाची संपूर्ण रक्कम ते आपल्या आईला देणार आहेत. कारण आपल्यासाठी आपली आईच सर्वकाही असल्याचे लव कुमार यांचे म्हणणे आहे. त्यांना लॉटरी लागल्याने त्यांचे कुटुंब खूप आनंदी झाले आहे. या यशाने आपल्या जीवनाला वेगळी दिशा दिल्याचे लव कुमार यांचे म्हणणे आहे.

पंजाब सरकारची लॉटरीत जिंकली रक्कम

पंजाब राज्य सरकारद्वारे दिवाळीच्या सणा निमित्त जारी केलेल्या डीअर दिवाळी बंपर लॉटरीचा निकाल 2024 जाहीर झाला त्यात हे बक्षिस मिळाले आहे. या लॉटरीचे पहिले बक्षिस 6 कोटी रुपये आहे.दोन विजेत्यात ते वाटले गेले. ही पंजाब राज्यातील सर्वात मोठी लॉटरी मानली जाते.यावेळी हजारो लोकांनी याची तिकीटे काढली होती. पहिला पुरस्कार दोन भागात ( सहा कोटी ) वाटला गोला. त्यामुळे दोन्ही विजेत्याना 3-3 कोटी प्रत्येकी मिळाले. बक्षिस मिळालेल्या तिकीटाचा नंबर A सिरीजमध्ये 540826 आणि बी सिरीजमध्ये 480960 होते. या लॉटरी विजयाने लव कुमारचे नशीब बदलले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.