Election 2022: पंतप्रधान मोदींच्या केदारनाथल दौऱ्यावर पुजार्‍यांचा विरोध !

| Updated on: Dec 24, 2021 | 2:57 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबरला केदारनाथला दौऱ्यावर जाणार आहेत, मात्र त्यांच्या दौऱ्याला विरोध सुरू झाला आहे. तीथल्या पुजार्‍यांकडून (पुरोहीत) पंतप्रधान मोदींच्या भेटीचा विरोध होतेय. परिस्थिती सावरण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी बुधवारी केदारनाथला जाऊन तेथील पुजार्‍यांशी चर्चा केली. त्यांनी बंद खोलीत जवळपास सात तास पुजार्‍यांशी बोलून त्यांच्या विरोधावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. (election 2022- agitation […]

Election 2022: पंतप्रधान मोदींच्या केदारनाथल दौऱ्यावर पुजार्‍यांचा विरोध !
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबरला केदारनाथला दौऱ्यावर जाणार आहेत, मात्र त्यांच्या दौऱ्याला विरोध सुरू झाला आहे. तीथल्या पुजार्‍यांकडून (पुरोहीत) पंतप्रधान मोदींच्या भेटीचा विरोध होतेय. परिस्थिती सावरण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी बुधवारी केदारनाथला जाऊन तेथील पुजार्‍यांशी चर्चा केली. त्यांनी बंद खोलीत जवळपास सात तास पुजार्‍यांशी बोलून त्यांच्या विरोधावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. (election 2022- agitation against pm modi visit -to uttarakhand, kedarnath)

दोन दिवसांपूर्वीपण माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि कॅबिनेट मंत्री धनसिंह रावत केदारनाथला गेले होते, त्यावेळीपण तीथल्या पुजार्‍यांकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. पुजाऱ्यांनी त्रिवेंद्र सिंह आणि धनसिंह यांना दर्शनही घेऊन दिल नाही. यानंतर पुजाऱ्यांनी मोदींच्या दौऱ्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला. पुजारी आणि पंडा समाजाचा विरोध पाहता आज मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केदारनाथला जाऊन पुजारी समाजाशी चर्चा केली. त्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याचा आढावाही घेतला.

उत्तराखंडमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणिक आहे. निवडणिकुच्या पार्श्वभूमीवर हा विरोध भाजपसाठी चिंतेची बाब आहे.

जानेवारी 2020 मध्ये त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या सरकारने चार धाम देवस्थान बोर्डाची स्थापना केली. त्यामुळे चार धामसह अन्य 51 मंदिरांचे नियंत्रण राज्य सरकारकडे आले. उत्तराखंडमधील चार धाम आहेत- केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आणि बद्रीनाथ. त्यानंतर पुजारी आणि पंडा समाजाने या निर्णयाचा विरोध केला आणि निर्णय मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर आताचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी 30 ओक्टोबर 2021 पर्यंत समिती स्थापन करुन, एक रिपोर्ट सादर करुन बोर्डाची स्थापनेचा निर्णय मागे घेईल असं सांगितलं होतं. मात्र, आजुनपर्यंत काहीही निर्णय झाला नाही म्हणून पुजारी आणि पंडा समाजाने उत्तराखंड सरकारचा विरोध सुरू केला. आणि आता पंतप्रधान मोदींच्या भेटीचा विरोध होतेय.

Other News

Elections 2022: निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक, 300 नेते उपस्थित राहणार

Deepotsav 2021: अयोध्येत 12 लाख दिव्यांची रोषणाई करण्यास सुरूवात, बघा VIDEO

हिमाचलमध्ये काँग्रेसची जादू, तीन विधानसभा आणि एक लोकसभेची जागा जिंकली; भाजपला जनआक्रोश भोवला?