AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच राज्यांमध्ये लवकरच निवडणुका, बुधवारच्या बैठकीत ठरणार तारीख, बंगालकडे विशेष लक्ष

पाच राज्यांत निवडणुकांची तारीख ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाने बुधावरी (23 फेब्रुवारी) बैठक आयोजित केली आहे. (election commission state assembly election)

पाच राज्यांमध्ये लवकरच निवडणुका, बुधवारच्या बैठकीत ठरणार तारीख, बंगालकडे विशेष लक्ष
भारतीय निवडणूक आयोग
| Updated on: Feb 23, 2021 | 11:53 PM
Share

नवी दिल्ली : आगामी काही महिन्यांमध्ये आसाम, केरळ, पुदुच्चेरी, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यातील विधानसभांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे येथे लवकरच विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकांची तारीख ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) बुधावरी (23 फेब्रुवारी) बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत निवडणुकांची तरीख तसेच, कोरोना संसर्ग, सुरक्षा, पोलीस संरक्षण या विषयांवर चर्चा होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. (Election commission will held meeting on wednesday for date fixing of five state assembly election)

पश्चिम बंगालकडे विशेष लक्ष

देशात कोरोना माहारीचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मतदानावेळी गर्दी न होऊ देण्याला निवडणूक आयोगाचे प्राध्यान असेल. यावर उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस, सीआरपीएफ बंदोबस्त यावरसुद्धा चर्चा केली जाणार आहे. आगामी काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्येसुद्धा विधानसभेची निवडणूक होईल. पश्चिम बंगाल हे राज्य निवडणुकीच्या बाबतीत संवेदनशील राज्य म्हणून ओळखले जाते. त्यामुळे विशेष करुन या राज्यात निवडणूक कार्यक्रम राबवताना कोणती काळजी घ्यावी?, यावरसुद्धा उद्याच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगानुसार पश्चिम बंगालमध्ये एकूण 6,400 मतदान केंद्रं संवेदनशील आहेत. त्यामुळे या मतदान केंद्रांचा आढावा घेण्यासाठी निवडणूक उपायुक्त सुदीप जैन गुरुवारी बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत.

एप्रील, मे मध्ये होऊ शकते निवडणूक

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांतील विधानसभांचा कार्यकाळ मे आणि जून महिन्यात संपणार आहे. त्यामुळे येथे एप्रील आणि मे या महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. देशात सध्या कोरोना महामारीचे संकट आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवली जाऊ शकते. नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर 1200 ऐवजी 1000 मतदारांना मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे येथे मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली होती. त्यानंतर आता या पाच राज्यांमध्येसुद्धा मतदान केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे.

इतर बातम्या :

ममता बॅनर्जींनंतर त्यांच्या कुटुंबातून केवळ ही व्यक्ती ‘मुख्यमंत्री’ पदाची दावेदार, भाजपकडून घेरण्याची तयारी

Gujarat Municipal Election Result : सूरतमध्ये काँग्रेसचा धुव्वा, AAP 2 नंबरचा पक्ष ठरण्याची शक्यता

पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार? पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले…

(Election commission will held meeting on wednesday for date fixing of five state assembly election)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...