AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPF चे पैसे कधीपासून ATM मधून निघणार, केंद्र सरकारने सांगितली डेडलाईन

Employees Provident Fund Organisation update News: ईपीएफओची प्रणाली बँकींग पद्धतीची करण्यात येणार आहे. जानेवारी 2025 पर्यंत ईपीएफओचे नवीन व्हर्जन IT 2.1 लॉन्च करण्यात येणार आहे. या नवीन प्रणालीमुळे पीएफ दावे वेगाने निकाली निघतील.

EPF चे पैसे कधीपासून ATM मधून निघणार, केंद्र सरकारने सांगितली डेडलाईन
epfo
| Updated on: Dec 12, 2024 | 2:50 PM
Share

Employees Provident Fund Organisation update News: केंद्र सरकारने कोट्यवधी पीएफ खातेदारांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) मध्ये असणारा खातेदाराचा पैसा सरळ एटीएममधून काढता येणार आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव सुमित्रा डावरा यांनी यासंदर्भात प्लॅन सांगितला. ईपीएफओ आपल्या आयटी प्रणालीत बदल करत आहेत. त्यामुळे पीएफ दावे निकाली काढण्याची प्रक्रिया वेगवान होणार आहे. तसेच पुढील वर्षी जानेवारी महिन्यापासून पीएफचे पैसे एटीएममधून काढता येणार आहे.

सुमित्रा डावरा यांनी सांगितले की, ईपीएफओची प्रणाली बँकींग पद्धतीची करण्यात येणार आहे. जानेवारी 2025 पर्यंत ईपीएफओचे नवीन व्हर्जन IT 2.1 लॉन्च करण्यात येणार आहे. या नवीन प्रणालीमुळे पीएफ दावे, लाभार्थी किंवा वारस असणार व्यक्तींना थेट एटीएममधून पैसे काढता येणार आहे. या सर्व प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. मानवी हस्तक्षेप कमी असणार आहे. त्यामुळे वेळ वाचणार आणि पारदर्शकता येणार आहे.

काय होणार बदल

पीएफची प्रकरणे वेगाने काढणार: सध्याच्या काळात पीएफची प्रकरणे निकाली काढण्यास मोठा कालावधी लागतो. परंतु नवीन प्रणाली ऑटोमेटेड असणार आहे. यामुळे पीएफची प्रकरणे वेगाने निकाली काढली जातील.

बँकिंग सिस्टमची सुविधा: बँकेत ज्या पद्धतीने व्यवहार करणे सोपे असतात, त्याच पद्धतीने पीएफ काढणेही सोपे करण्यात येणार आहे. मानवी हस्तक्षेप कमी होणार आहे. त्यामुळे फसवणूक आणि गैरव्यवहार टळणार आहे.

ईपीएफओचे व्हिजन: भविष्यात ईपीएफओ आयटी प्रणालीने अत्याधुनिक बनवला जाणार आहे. त्यामुळे पीएफ खातेदारांना प्रत्येक सुविधा मोबाईलवर किंवा जवळच्या एटीएम केंद्रावर मिळणार आहे.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव सुमित्रा डावरा यांनी सांगितले की, देशात बेरोजगारीच्या दरात घट झाली आहे. २०१७ मध्ये बेरोजगारीचा दर सहा टक्के होता. तो आता ३.२ टक्के आला आहे. तसेच कामगार भागिदारीची टक्केवारी वाढत आहे. आता ती ५८ टक्क्यांपर्यंत गेली आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.