AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत येण्या-जाण्यासाठी अजित पवार यांची सोय…संजय राऊत यांनी नेमके काय म्हटले?

Sanjay Raut on Ajit Pawar: राज्यात २० तारखेला निवडणुका झाल्या. त्याला आता एक महिना झाला आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ बनत नाही. राज्यात रोज खून होत आहे, हत्या होत आहे. दंगली होत आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस नाकाने कांदे सोलत आहे. ते आम्हाला अक्कल शिकवत आहे, असे राऊत म्हणाले.

दिल्लीत येण्या-जाण्यासाठी अजित पवार यांची सोय...संजय राऊत यांनी नेमके काय म्हटले?
संजय राऊत, खासदार, ठाकरे गटImage Credit source: ANI
| Updated on: Dec 12, 2024 | 11:17 AM
Share

Sanjay Raut on Ajit Pawar: शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतून महायुती सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यात मंत्रिमंडळ अजूनही तयार होत नाही, त्याबद्दल जोरदार टीका केली. शरद पवार यांच्याविषयी आदराच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, देशाच्या सामाजिक क्षेत्रात शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. आम्हाला त्यांचे मार्गदर्शन नेहमीच मिळाले आहे. आज पवार साहेब दिल्लीत होते. त्या ठिकाणी आम्ही शिवसेना आणि काँग्रेसचे खासदार गेलो होते. पवार साहेबांना शुभेच्छा दिल्या.

सुनील तटकरे यांच्यावर टीका

शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी सुनील तटकरे आले होते, त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, हे निर्ढावलेले लोक आहेत. आम्ही असे काही केले असते तर आमची डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नसती. आम्ही स्वार्थासाठी चूक केली असेल तर आमची बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासमोर नजर भिडवण्याची माझी हिंमत झाली नसती. त्यांच्याविरोधात प्रचार केला. चिखलफेक केली, आज ते शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत.

सुनेत्रा पवार यांच्या दिल्लीत निवासस्थानावर म्हणाले…

दिल्लीत खासदार शरद पवार यांना सहा जनपथ हे टाईप १ घर दिले. तर पहिल्यांदा खासदार झालेल्या सुनेत्रा पवार यांना ११ जनपथ टाईप ७ घर दिले आहे. या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही जेव्हा प्रथम आलो तेव्हा आम्हाला साधे घर दिले. कारण आम्ही प्रथम खासदार होतो. सुनेत्रा पवार यांना हे घर देऊन त्यांनी अजित पवार यांची सोय केली आहे. दिल्लीत अजित पवार यांना येणे-जाणे सोईचे व्हावे, यासाठी केलेला हा प्रकार आहे. भाजप सरकार कटकारस्थान करत असते. काही लोकांना कमी लेखत असते. दिल्ली ही कारस्थानाची राजधानी आहे.

देवेंद्र फडणवीस नाकाने कांदे सोलत…

दिल्लीत अजित पवार आले पण एकनाथ शिंदे आले नाही, याप्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, या विषयी मला माहीत नाही. राज्यात २० तारखेला निवडणुका झाल्या. त्याला आता एक महिना झाला आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ बनत नाही. राज्यात रोज खून होत आहे, हत्या होत आहे. दंगली होत आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस नाकाने कांदे सोलत आहे. ते आम्हाला अक्कल शिकवत आहे, असे राऊत म्हणाले.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.