AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडब्ल्यूएस आरक्षणाची 13 सप्टेंबरपासून सुनावणी, सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ संवैधानिक वैधता तपासणार

ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या विविध पैलूंचा 6 सप्टेंबरला आढावा घेतला जाईल आणि 13 सप्टेंबरपासून याप्रकरणी अंतिम सुनावणी घेऊ, असे घटनापीठाने म्हटले आहे.

ईडब्ल्यूएस आरक्षणाची 13 सप्टेंबरपासून सुनावणी, सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ संवैधानिक वैधता तपासणार
Supreme CourtImage Credit source: tv9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Aug 30, 2022 | 11:48 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मागास प्रवर्गाच्या अर्थात ईडब्ल्यूएस आरक्षणा (EWS Reservation)च्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)त 13 सप्टेंबरपासून अंतिम सुनावणी (Final Hearing) होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. देशातील गोरगरीब लोकांना उच्च शिक्षणाची तसेच सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्याच नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठाने या प्रकरणाची प्राधान्याने सुनावणी घेण्याची सहमती दर्शवली आहे.

ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या विविध पैलूंचा 6 सप्टेंबरला आढावा घेतला जाईल आणि 13 सप्टेंबरपासून याप्रकरणी अंतिम सुनावणी घेऊ, असे घटनापीठाने म्हटले आहे. घटनापीठामध्ये न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती एस. रविंद्र भट, न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी आणि न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला यांचा समावेश आहे.

केंद्राच्या निर्णयाची घटनात्मक वैधता तपासणार

आर्थिक मागास प्रवर्गाला उच्च शिक्षण आणि सरकारी नोकर्‍यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने 2019 मधील 103 व्या संवैधानिक दुरुस्ती कायद्यामध्ये तरतूद केली. केंद्राच्या या निर्णयाची घटनात्मक वैधता आम्ही तपासणार असल्याचे पाच सदस्यीय घटनापीठाने स्पष्ट केले.

आंध्र प्रदेश न्यायालयाच्या निकालाविरोधाती अपिलांवरही सुनावणी घेणार

आंध्र प्रदेशमध्ये मुस्लिमांना सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी) रुपात दिलेले आरक्षण आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. त्या निकालाविरोधातील अपिलांवरही घटनापीठ नंतर सुनावणी घेणार आहे.

आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने चार न्यायाधीशांच्या निकालात या तरतुदी ‘स्टेट टू मुस्लिम कम्युनिटीज अ‍ॅक्ट’ 2005 अंतर्गत घटनाबाह्य घोषित केल्या. घटनापीठाने शादान फरासात, नचिकेता जोशी, महफूज नजकी आणि कानू अग्रवाल या चार वकिलांना नोडल वकील म्हणून काम करण्यास सांगितले आहे.

मुस्लिम SBEC आरक्षणाशी संबंधित प्रकरण 2005 चे दिवाणी आहे. ज्यामध्ये मुस्लिमांना एक समुदाय म्हणून संविधानाच्या कलम 15 आणि 16 अंतर्गत शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घोषित केले जाऊ शकते की नाही हा मुद्दा उपस्थित केला जातो. (EWS reservation will be heard in the Supreme Court from September 13)

Follow Us
नीता अंबानी ठरल्या मोस्ट पॉवरफुल वुमन 2026, मुंबईतील भव्य कार्यक्रमात
Nita Ambani | नीता अंबानी ठरल्या मोस्ट पॉवरफुल वुमन 2026, मुंबईतील भव्य कार्यक्रमात बहुमान!
भारतासह इतर देशांचे 650 विमान उड्डाण रद्द; अचानक... नेमकं काय घडतंय?
भारतासह इतर देशांचे 650 विमान उड्डाण रद्द; अचानक... नेमकं काय घडतंय?
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा... संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा... संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा मार्ग
मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; 83 तासांनी शोध मोहीम थांबवली
Moshi Building Collapsed | मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली
'मातोश्री'बंगल्यावरही बंगाली बाबा... विनायक राऊतांच्या प्रकरणावर बोलता
'मातोश्री' बंगल्यावरही बंगाली बाबा... विनायक राऊतांच्या प्रकरणावर बोलताना नेत्याचा मोठा खुलासा!
एकच खळबळ! दूध नाही नुसता पावडर, 200 हुन अधिक दूध संकलन केंद्रांना...
एकच खळबळ! दूध नाही नुसता पावडर, 200 हुन अधिक दूध संकलन केंद्रांना... FDA ची धडक कारवाई
2 कोटींचा दबाव टाकला आणि...गिरीजा राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!
Girija Raut | 2 कोटींचा दबाव टाकला आणि...गिरीजा राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!
अमित शहांनी खरंच एकनाथ खडसेंना कॉल केला होता? भाजप नेत्यांचं उत्तर
अमित शहांनी खरंच एकनाथ खडसेंना कॉल केला होता? भाजप नेत्यांची प्रतिक्रिया तुफान चर्चेत
अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
मोठी बातमी! अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी...विनायक राऊतांच्या सूनेनं
कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी...विनायक राऊतांच्या सूनेनं सांगितली लग्नानंतरची प्रत्येक घटना