AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS: माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आरएसएसच्या शताब्दी वर्षाचे उद्घाटन

या वर्षी श्री विजयादशमी उत्सव गुरुवार, 2 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7:40 वाजता रेशमबाग मैदानावर आयोजित केला जाणार आहे. यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे असतील आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे मार्गदर्शनपर भाषण करणार आहेत.

RSS: माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आरएसएसच्या शताब्दी वर्षाचे उद्घाटन
Rss Press
| Updated on: Sep 22, 2025 | 7:57 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 2 ऑक्टोबर 2025 ते 2025 मधील विजयादशमी म्हणजेच दसऱ्यापर्यंत आपले शताब्दी वर्ष साजरे करणार आहे. या शताब्दी वर्षात संघाचे स्वयंसेवक परिवर्तनाच्या पाच तत्वांबद्दल जनजागृती करणार आहेत. यात पर्यावरण संरक्षण, सामाजिक समता, स्वावलंबन, कुटुंब ज्ञान आणि नागरी कर्तव्य या तत्त्वांचा समावेश आहे. या शताब्दी वर्षात घरोघरी मोहिमा, हिंदू परिषदा आणि सामाजिक सलोखा बैठका देखील आयोजित केल्या जाणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नागपूरमधील रेशीमबाग येथील टेंगरी सभागृहात एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी यंदाच्या श्री विजयादशमी उत्सवाबाबत माहिती दिली. यावेळी विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार आणि नागपूर महानगर संघचालक राजेश लोया हे देखील उपस्थित होते.

सुनील आंबेकर यांनी यावेळी बोलताना म्हटले की, हिंदू समाजात श्री विजयादशमीचा पवित्र सण हा पुरुषत्व आणि शक्ती जागृत करण्याचा उत्सव आहे. या पवित्र प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 100 वर्षे पूर्ण केली आहेत. जागतिक शांती आणि मानवी कल्याणासाठी शतकानुशतके केलेल्या हिंदू समाजाच्या दीर्घ प्रवासाचा हा कळस आहे. या वर्षी श्री विजयादशमी उत्सव गुरुवार, 2 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7:40 वाजता रेशमबाग मैदानावर आयोजित केला जाणार आहे. यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे असतील आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे मार्गदर्शनपर भाषण करणार आहेत.

पुढे बोलताना सुनील आंबेकर यांनी म्हटले की, आरएसअसच्या शताब्दी वर्षाबाबत स्वयंसेवकांमध्ये आणि संपूर्ण भारतात उत्साहाचे वातावरण आहे. संघावरील जनतेचा विश्वास वाढत आहे. आज संघाच्या शाखा देशातील सर्व प्रांतांमध्ये, अगदी दुर्गम भागातही विस्तारल्या आहेत. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी व्यक्तींच्या विकासासाठी संघटनेची स्थापना केली. नागपूर येथील त्यांच्या घरी झालेल्या पहिल्या बैठकीत सतरा कॉम्रेड उपस्थित होते. तिथून सुरू झालेले काम आता समाजाच्या पाठिंब्याने, सहभागाने आणि कठोर परिश्रमाने मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे.

संघाच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात संघ लगेच विस्तारला नाही. काही काळानंतर हळूहळू हेतू स्पष्ट झाला आणि 17 एप्रिल 1926 रोजी एका बैठकीत विविध नावांवर चर्चा झाली आणि सर्वांनी एकमताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव देण्याचा निर्णय घेतला. 28 मे 1926 रोजी, मोहिते बडा, महाल भाग येथे पहिली शाखा स्थापन करण्यात आली, ज्याला आपण आज संघ मुख्यालय म्हणून ओळखतो.

संघाच्या कार्यासाठी शाखांचा विस्तार होणे महत्त्वाचे होते. सध्या 83 हजारांपेक्षा जास्त शाखा आहेत. 32 हजारांपेक्षा जास्त साप्ताहिक बैठका होतात. संघाचा पूर्ण गणवेशातील पहिला मोर्चा 1926 मध्ये निघाला होता. ही मिरवणूक मोहिते बाडा येथून सुरू होऊन हनुमान नगर येथील राजबक्ष मंदिरात पोहोचली. सुरुवातीला संघाचा विजयादशमी उत्सव मोहिते बाडा येथे होत असे. तथापि, कामाचा विस्तार आणि शाखांची संख्या वाढल्याने यशवंत स्टेडियममध्ये उत्सव सुरू झाला. त्यानंतर कस्तुरचंद पार्क आणि 1995 पासून श्री विजयादशमी उत्सव रेशीमबाग येथे आयोजित केला जात आहे.

सुनील आंबेकर पुढे बोलताना म्हणाले की, विजयादशमीला स्वयंसेवकांची उपस्थिती दरवर्षी वाढते. गेल्या वर्षी गणवेशातील 7000 स्वयंसेवक उपस्थित होते. या वर्षी संख्या तिप्पट वाढण्याची अपेक्षा आहे. शाखा स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. शताब्दी वर्षात अनेक स्वयंसेवकांना ऊर्जा मिळाली आहे. कार्यक्रमाची सुरुवात शस्त्रपूजनाने होईल, त्यानंतर प्रदक्षिणा, योग प्रात्यक्षिक, नियुध्द आणि घोष प्रत्यक्षा होईल.

शताब्दी वर्षाबद्दल बोलताना आंबेकर म्हणाले की, शताब्दी वर्षात आम्ही घरोघरी संपर्क साधणार आहोत. या मोहिमेअंतर्गत, लोकांना संघाबद्दल थेट माहिती दिली जाणार आहे. शताब्दी वर्षात संघाची विचारधारा आणि कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच दरवर्षी हिंदू अधिवेशने आयोजित केली जाणार आहेत. 26, 27 आणि 28 ऑगस्ट रोजी दिल्लीत संवाद सत्र आयोजित करण्यात आले होते.

यानंतर आता 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी बंगळुरूमध्ये संवाद सत्र आयोजित केले जाणार आहे. ज्याला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत संबोधित करणार आहेत. त्यानंत 21 डिसेंबर रोजी कोलकाता येथे एक दिवसीय संवाद सत्र आयोजित केले जाणार आहेत. पुढील वर्षी 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी मुंबईत संवाद सत्र आयोजित केले जाणार आहे. तसेच 28 सप्टेंबर आणि 5 ऑक्टोबर रोजी नागपुरात नवजात शिशु आणि मुलांसाठी श्री विजयादशमी उत्सव आयोजित केला जाणार आहे.

यावर्षी मणिपूरमध्ये विजयादशमी उत्सवाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे असल्याची माहितीती आंबेकर यांनी दिली आहे. यंदा या भागातील लोकही विजयादशमी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे. श्री विजयादशमी उत्सवात भारत आणि परदेशातील मान्यवर सहभागी होतील. यामध्ये लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता (माजी जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, भारतीय लष्कर), के.व्ही. कार्तिक आणि त्यांचे कुटुंबीय कोइम्बतूर (व्यवस्थापकीय संचालक, डेक्कन इंडस्ट्रीज) आणि संजीव बजाज (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, बजाज फिनसर्व्ह, पुणे) यांचा समावेश असेल.त्याचबरोबर घाना, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, थायलंड, यूके आणि यूएसए येथील मान्यवरांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.

27 सप्टेंबर रोजी भव्य पथसंचलन होणार

यंदा 27 सप्टेंबर 2025 रोजी पथसंचलन होणार आहे. प्रथमच 3 ठिकाणांवरून पथसंचलनाला सुरुवात होणार आहे. तिन्हीपथसंचलने सीताबर्डी येथील व्हरायटी चौकात सायंकाळी 7:45 वाजता एकत्र येतील. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ पथसंचलनाचे निरीक्षण करतील. पहिले पथसंचलन कस्तुरचंद पार्क येथून, दुसरे यशवंत स्टेडियम येथून आणि तिसरे पथसंचलन अमरावती रोडवरील हॉकी ग्राउंड येथून सुरू होणार असल्याची माहिती आंबेकर यांनी दिली आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?