AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदाबाद विमान अपघाताच्या चार दिवसानंतर एअर इंडियाचे 112 पायलट आजारी पडले होते, अचानक मागितली सुट्टी

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानातील एक प्रवासी वगळता सर्व २४१ प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाला होता. या शिवाय हे विमान ज्या मेडिकल हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळले त्यातही अनेक जण ठार झाले. असे एकूण २६० जणांचा मृ्त्यू झाला होता.

अहमदाबाद विमान अपघाताच्या चार दिवसानंतर एअर इंडियाचे 112 पायलट आजारी पडले होते, अचानक मागितली सुट्टी
air india accident
| Updated on: Jul 24, 2025 | 10:24 PM
Share

अहमदाबादमध्ये १२ जून २०२५ रोजी झालेल्या विमान अपघातानंतर चार दिवसांनी एअर इंडियाच्या ११२ पायलटने अचानक रजा घेतली होती अशी माहिती उघडकीस आली होती. नागरिक उड्डाण मंत्रालयाचे राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संसदेत ही माहिती दिली. त्यांनी दुजोरा देताना सांगितले की एअर इंडिया AI- १७१ च्या अपघातानंतर सर्व फ्लीटच्या पायलटांच्या वतीने सिक लिव्हचे अर्ज वाढण्याचा प्रकार घडला होता.

हादसे के बाद 112 पायलट छुट्टी पर गए

फ्लाईट क्रमांक एआय-१७१ अपघातानंतर एअर इंडियाच्या पायलटनी सामुहिक सिक लीव्ह घेतल्याच्या संदर्भात भाजपाचे सदस्य जय प्रकाश यांच्या प्रश्नाला राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लेखी उत्तरात सांगितले की १६ जून रोजी एकूण ११२ पायलटनी आजारी असल्याचे माहिती दिली होती. त्यात ५१ कमांडर्स ( पी१) आणि ६१ फर्स्ट ऑफीसर ( पी २ ) सामील होते.

अपघातानंतर नागरी उड्डयन महासंचालकांनी ( डीजीसीए ) एका मेडिकल सर्क्युलरमध्ये एअरलाईन्सला सल्ला दिला होता की त्यांनी फ्लाईट क्रु आणि एअर ट्रॅफीक कंट्रोलर्सच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच आरोग्यावर होणाऱ्या प्रतिकूल प्रभावांना दूर करण्यासाठी ट्रेनिंग प्रोग्रॅम सुरु करावा.

मानसिक आरोग्यावर फोकस

यावेळी राज्य मंत्र्यांनी सांगितले की, मानसिक आरोग्याच्या तपासणी संबंधी ऑपरेटर्स, एफटीओ आणि एएआयला आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक सपोर्ट प्रोग्रॅम बनविण्याचा सल्ला ही दिला आहे.एअरलाईन्सने या दिशेने काम करण्याची आवश्यकता आहे.म्हणजे फ्लाईट क्रू मेंबर्स/एटीसीओना कोणत्याही समस्येला ओळखणे आणि त्याचा सामना करणे आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत मिळेल.

सर्वात मोठा विमान अपघात

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान ( AI-171 ) धावपट्टीहून उड्डाण घेतात काही सेकंदात कोसळले होते. या एक प्रवासी वगळता सर्व २४१ प्रवाशांचा मृत्यू जाला होता. हे विमान हॉस्टेलवर कोसळल्याने तेथेही मनुष्यहानी झाली त्यामुळे मृत्यूचा आकडा २६० हून अधिक झाला. मृत्यूमध्ये ब्रिटन आणि कॅनडाचे नागरिक देखील होते.

Follow Us
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी....
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी.....
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?.
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....