AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेन्नईच्या एअर शोमध्ये असं काय घडलं? 4 जणांनी सोडले प्राण आणि 200 हून जणांना केलं हॉस्पिटलमध्ये दाखल

चेन्नईत भारतीय वायूसेनेच्या 'एअर शो'मध्ये वाईट दुर्घटना घडली आहे. या कार्यक्रमात जीव गुदमरल्यामुळे आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहेत. तसेच 200 पेक्षा जास्त जणांना प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

चेन्नईच्या एअर शोमध्ये असं काय घडलं? 4 जणांनी सोडले प्राण आणि 200 हून जणांना केलं हॉस्पिटलमध्ये दाखल
चेन्नईत मोठी दुर्घटना, एअर शो मध्ये जीव गुदमरल्याने 4 जणांचा मृत्यू
| Updated on: Oct 06, 2024 | 10:31 PM
Share

भारतीय वायूसेनेच्या 92 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने चेन्नईत एअर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या हवाई शोच्या दरम्यान डिहायड्रेशनमुळे आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच 230 पेक्षा जास्त जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पेरुंगलथूरचे 48 वर्षीय श्रीनिवास, तिरुवोट्टियूरचे 34 वर्षीय कार्तिकेयन आणि कोरुकुपेटचे 56 वर्षीय जॉन यांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांमधील खराब कॉर्डिनेशनमुळे चेन्नईत लाखो नागरीक फसले होते. शहरातील अनेक भागात अशाप्रकारच्या घटना समोर आल्या. अनेक तास लाखो नागरीक फसले होते. अखेर त्यांना गर्दीमुळे आणि पाणी न मिळाल्यामुळे त्रास झाला, त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. कार्यक्रमानंतर घरी परतताना लाखो नागरीक एकत्र बाहेर पडत असताना संबंधित घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वायूसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मरीना बीच येथे एअर शो रविवारी (6 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत चालला. या कार्यक्रमासाठी सकाळी 8 वाजेपासून नागरीक कार्यक्रमस्थळी आले होते. मरीना बीचवर सकाळपासून तडपतं ऊन होतं. गरमीमुळे कार्यक्रम सुरु होण्याआधीच अनेक वयस्कर नागरीक बेशुद्ध झाले होते.

पाणी विक्रेत्यांना हटवण्यात आलं आणि…

गर्दीमुळे आजूबाजूच्या पाणी विक्रेत्यांना परिसरातून हटवण्याच आलं होतं. तिच मोठी चूक ठरली. कारण तिथे उपस्थित असलेल्या लाखो नागरीकांना त्यामुळे पाणी मिळालं नाही. कार्यक्रम संपताच लाखो नागरीक बीचपासून बाहेर पडू लागले. यावेळी पूर्ण रस्ता ब्लॉक झाला. प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाल्यामुळे शेकडो वाहनं स्थानबद्ध झाले. तडपतं ऊन आणि गर्दी यामुळे नागरीक रस्त्याच्या कडेलाच बसले.

यावेळी समुद्र किनाऱ्यावर राहणारी अनेक नागरीक मदतीसाठी पुढे आले. त्यांनी नागरिकांना पाणी देवून मदत केली. याचवेळी मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी उसळली. कारण नागरिक तिथे बसून कंटाळले होते. त्यांना कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर घरी जायचं होतं. पण त्यामुळे अनेकांना त्रास झाला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.