AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्मचाऱ्यांच्या १८ महिन्यांच्या महागाई भत्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

सरकार महागाई भत्ता सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना देते. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए दर सहा महिन्यांनी बदलला जातो.

कर्मचाऱ्यांच्या १८ महिन्यांच्या महागाई भत्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
| Updated on: Mar 14, 2023 | 10:55 AM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांना कोरोनाच्या काळात १८ महिन्यांसाठी रोखलेला डीए आणि डीआर (DA Arrears)मिळणार की नाही, यासंदर्भात घोषणा केली आहे. अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी (Pankaj Chaudhary) यांनी राज्यसभेत यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या दरम्यान माहिती दिली. भविष्यातही या १८ महिन्यांचा डीए व डीआर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना देण्याची सरकारची कोणतीही योजना नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

का देणार नाही डीए

अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, जानेवारी २०२०, जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ रोजी जारी करण्यात आलेला महागाई भत्ता न देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीत 34 हजार 402.32 कोटी रुपयांची बचत झाली आहे. ते म्हणाले की, डीएची थकबाकी न देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे महामारीच्या काळात होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यात मोठी मदत झाली आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत सुमारे 52 लाख कर्मचारी आणि 60 लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे.

महामारीच्या काळात सरकारला कल्याणकारी योजनांसाठी भरपूर निधीची तरतूद करावी लागली. त्याचा परिणाम 2020-21 मध्ये आणि त्यानंतरही दिसून आला. या परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची थकबाकी 2020-21 ची आहे, जी देणे योग्य नव्हते. कारण सरकारचा आर्थिक तोटा एफआरबीएम एक्टच्या(FRBM Act) पातळीपेक्षा दुप्पट आहे.

कर्मचाऱ्यांना होती अपेक्षा

डीए वाढीच्या निर्णयानंतर, कोरोनाच्या काळात रोखून धरलेल्या थकबाकी सरकार देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र आता डीएची थकबाकी देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. या निर्णयामुळे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना धक्का बसला आहे.

महागाई भत्ता (DA) हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा एक भाग आहे. सरकार महागाई भत्ता सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना देते. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए दर सहा महिन्यांनी बदलला जातो. गेल्या वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये मोदी सरकारने कर्मचाऱ्यांना 4% DA वाढ दिली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

केंद्र सरकारने कोविड-19 मुळे 1 जानेवारी 2020 पासून DA चे तीन हप्ते (1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020, 1 जानेवारी 2021) थांबवले होते. यानंतर, सरकारने जुलै 2021 मध्ये डीए बहाल केला, परंतु तीन हप्त्यांचा डीए बाकी राहिला.

Follow Us
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.
भोंदूबाबाकडे गेलेल्या मंत्र्यांना सहआरोपी करा, संजय राऊत यांची मागणी
भोंदूबाबाकडे गेलेल्या मंत्र्यांना सहआरोपी करा, संजय राऊत यांची मागणी.
रुपाली चाकणकर यांनी एक वर्षांपूर्वी खरातला वाचवले- रुपाली ठोंबरे पाटील
रुपाली चाकणकर यांनी एक वर्षांपूर्वी खरातला वाचवले- रुपाली ठोंबरे पाटील.
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.