AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मटन नल्लीवरून वऱ्हाडींनी एकमेकांना धू धू धुतले… लग्नही मोडलं; कारण ऐकून पोलीसही थक्क

ऐकून आश्चर्य वाटेल पण जेवणात फक्त मटण नल्ली मिळाली नाही म्हणून वरात घेऊन आलेले सगळे इतके चिडले की वराकडच्या लोकांनी सरळ लग्नच मोडलं आणि वधूला न घेता वरात तशीच परत गेली.

मटन नल्लीवरून वऱ्हाडींनी एकमेकांना धू धू धुतले... लग्नही मोडलं; कारण ऐकून पोलीसही थक्क
| Updated on: Dec 26, 2023 | 2:28 PM
Share

हैदराबाद | 26 डिसेंबर 2023 : लग्न म्हटलं की रुसवे-फुगवे, मानापमान होत असतातच. कधी घेण्यादेण्यावरून वाजतं, तर कधी जेवणावरून वाद होतो. पण काही दिवसांपूर्वी तेलंगणमध्ये वराकडचे लोक आणि वधूकडची मंडळी यांच्यादरम्यान अशा गोष्टीवरून महायुद्ध झालं, ज्याबद्दल कोणी विचारच करू शकणार नाही. त्या भांडणामागचं कारण ऐकाल तर तुम्हीही हैराण व्हाल. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण जेवणात फक्त मटण नल्ली मिळाली नाही म्हणून वरात घेऊन आलेले सगळे इतके चिडले की वराकडच्या लोकांनी सरळ लग्नच मोडलं आणि वधूला न घेता वरात तशीच परत गेली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाची मिरवणूक तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यातून निजामाबादला पोहोचली होती. लग्नात मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी मांसाहारी जेवणाची व्यवस्था केली होती. सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालले होते, सगळं काही ठीक होतं. पण मटण नल्ली न मिळाल्याने लग्नात आलेल्या पाहुण्यांनी अचानक गोंधळ सुरू केला. हा वाद इतका वाढला की मुलाच्या कुटुंबियांनी थेट लग्न मोडण्याचाच निर्णय घेतला.

मटण नल्ली मिळाली म्हणून वऱ्हाडी झाले नाराज

लग्नात आलेल्या पाहुण्यांचा आरोप आहे की, त्यांना जेवणात मटण नल्ली देण्यात आली नाही. त्यामुळे वधूकडची मंडळी आणि वराकडचे नातेवाईक यांच्यात भांडणं सुरू झाली. हा वाद एवढा वाढला की ते प्रकरण थेट पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलीस अधिकार्‍यांनी वराला आणि त्याच्या कुटुंबीयांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नात आलेल्या पाहुण्यांना मटण नल्ली न दिल्याने अपमान केला आहे, असे सांगून वराकडी मंडळी लग्न मोडण्यावर ठाम राहिली.

पण मुलाच्या कुटुंबीयांनी आम्हाला याबाबत आधी काहीच माहिती दिली नव्हती, असा युक्तिवाद वधूच्या बाजूने करण्यात आला. या कारणास्तव त्यांनी मांसाहारी जेवणामध्ये मटण नल्लीचा समावेश केला नाही. पण जेवणात मटण नल्ली मिळाली की नाही, या एवढ्याशा छोट्या मुद्यावरून कोणी लग्न कसं मोडू शकतं, या विचाराने पोलीस आणि स्थानिक लोक आश्चर्यचकित झाले. मात्र, बरीच समज देऊनही वराकडच्या लोकांनी काहीच ऐकलं नाही आणि ते वधूला न घेताच घरी परत गेले.

अजब मागणीवरून लग्न मोडण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. याआधीही असाच वाद उत्तर प्रदेशातील बागपतमधून समोर आला होता, तेव्हा मटर पनीरची भाजी न मिळाल्याने वराच्या काकाला राग आला होता. यानंतर लग्नात एवढा गदारोळ झाला की काही वेळातच वातावरण युद्धभूमीत बदलले.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.