AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाफ पॅण्ट आणि बनियनमध्ये फिराल तर काही खैर नाही, ग्रामपंचायतीने केला ठराव…

या संदर्भात पोलिसांनी हात वर केले आहेत. जर सर्व संमतीने हा निर्णय घेतला असेल तर पोलिस हस्तक्षेप करु शकत नाहीत. त्यामुळे आम्ही कारवाई करु शकत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

हाफ पॅण्ट आणि बनियनमध्ये फिराल तर काही खैर नाही, ग्रामपंचायतीने केला ठराव...
dress codeImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 27, 2024 | 12:59 PM
Share

सध्या ड्रेस कोडवरुन देशात वाद सुरु आहेत. शाळांतील गणवेशवरुन काही समुदायांनी आक्षेप घेतला आहे. काही मंदिरात स्वतंत्र ड्रेस कोड असतात. त्यावरुन अधूनमधून बातम्या येत असतात. आता एका ग्रामपंचायतीने पुरुषांना हाफपॅण्ट आणि बनियनमध्ये सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई करणारा ठराव पास केला आहे. जर गावातील तरुण जर हाफ पॅण्ट आणि बनियनमध्ये फिरताना दिसला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे या ग्रामपंचायतीने म्हटले आहे. अखेर या कठोर कारवाई मागे काय कारण आहे. याची तुम्हाला उत्सुकता असेल तर ते कारणही हटके आहे.

हरियाणातील भिवानी ग्रामपंचायतीने हा ठराव मंजूर केला आहे. त्यानूसार जर गावातील तरुण हाफ पॅण्ट आणि बनियनमध्ये फिरताना दिसले तर ग्रामपंचायत त्यांच्या दंडात्मक कारवाई करणार आहे. हा ठराव एका महिला सरपंचाने केला आहे. या गावातील महिला सरपंच रेणू यांचे सासरे सुरेश कुमार यांनी सांगितले की तरुण हाफपॅण्ट घालून गावात फिरत असतात. त्यामुळे गावातील भगिनींना आणि मुलींना अतिशय लाजीरवाने वाटते. त्यामुळे आपल्या सुनेने हा ठराव आणला होता.  हा आदेश पाळला नाही तर अशा तरुणांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांशी बोलून त्यांना असे न करण्याबाबत समज दिली जाणार आहे. जर तरीही ते ऐकले नाही तर त्यावर ग्रामपंचायत स्वतंत्रपणे निर्णय घेईल असेही सुरेश यांनी सांगितले.

या आदेशाची पंचक्रोशीत चर्चा

या गावातील संरपंचाचा आदेशाचे पालन होते की नाही याची तपासणी चौकीदारामार्फत केली जाणार आहे. या आदेशानंतर गुजरानी गावातील तरुणांना हाफ पॅण्टमध्ये फिरणे बंद केले आहे. घरात युवकांनी जशी मर्जी तसे रहावे परंतू दुसऱ्यांच्या घरी किंवा गल्लीत फिरताना त्यांना पूर्ण फुल पॅण्टमध्ये फिरावे लागेल. या आदेशानंतर दुसऱ्या ग्रामपंचायतीचे देखील त्यांना फोन येऊ लागले आहेत. त्या पंचायती देखील त्यांच्या गावात हा नियम लागू करु इच्छित आहेत असेही सुरेश कुमार यांनी सांगितले.

पोलिसांनी हात वर केले

भिवानी गावची लोकसंख्या सात हजार आहे. या गावात 1250 घरे आहेत. गावात बॅंकेपासून शाळा देखील आहेत. याबद्दल या गावाच्या पोलिसांना काहीही माहीती नाही. पोलिसांनी जर ग्रामपंचायतीने बहुमताने हा ठराव मंजूर केला आहे तर त्यात पोलिस हस्तक्षेप करु शकत नाही असे पोलिसांनी म्हटले आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.