AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-पाकिस्तान अणूयुद्धाची भयानक भविष्यवाणी, लाखों लोकांच्या जीवाला धोका

भारत आणि पाकिस्तानमध्ये अणूयुद्ध झाले तर सुमारे ५० ते १२५ दशलक्ष लोक तात्काळ मारले जाऊ शकतात. पाकिस्तान आणि भारतातील प्रमुख शहरे पूर्णपणे नष्ट होतील किंवा राहण्यायोग्य राहणार नाहीत. शिवाय, पायाभूत सुविधांचा पूर्णपणे नष्ट होईल असे संशोधन अहवालात म्हटले आहे.

भारत-पाकिस्तान अणूयुद्धाची भयानक भविष्यवाणी, लाखों लोकांच्या जीवाला धोका
| Updated on: May 09, 2025 | 8:48 PM
Share

भारत आणि पाकिस्तान यांनी वाढत्या तणावामुळे २०१९ रोजी एका संशोधनात्मक अहवालात एक भयानक भविष्यवानी केली आहे.ज्यात साल २०२५ मध्ये आण्विक संघर्षाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.एका अभ्यासात भारत आणि पाकिस्तानात अतिरेकी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान दरम्यान आण्विक युद्ध भडकू शकते. त्याचा शेवटी आण्विक युद्धात परिवर्तित होऊ शकतो…

या अभ्यास अलिकडे जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. यात २६ पर्यटकांचा मृत्य झालेला आहे. या हल्ल्यानंतर दोन्ही देशात मोठा ताण पसरला आहे.आणि अनेक पाकिस्तानी नेत्यांनी अणू हल्ल्याची धमकी दिली आहे.

शोध निबंधात काय म्हटले आहेत. रुटलेजद्वारा प्रकाशित या संशोधनात असे म्हटले आहे की भारत -पाकिस्तान युद्धाच्या संभाव्य कारणांचा छडा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.संशोधन कर्त्याचे म्हणणे आहे की जर कोणताही मोठा अतिरेकी हल्ला झाला तर तो भारताला नियंत्रण रेषार ( एलओसी ) वर सैनिकांना तैनात करण्यास भाग पाडेल. त्यानंतर पाकिस्तान देखील त्यांचा सैन्याला तयार करेल.दोन्ही देशातील झटापट वाटेल. यातून ताण-तणाव वाढतच राहील.जर भारतीय सेना पाकमध्ये शिरली तर ते त्यांच्या सीमेच्या रक्षणाकरीता पाकिस्तान अणू हल्ल्याची धमकी देऊ शकतो.

भारत-पाकिस्तान युद्धाच्या अभ्यासानुसार, जर भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या आत प्रवेश केला तर पाकिस्तान पहिल्या दिवशी ५ किलोटन क्षमतेची १० अण्वस्रे वापरेल. यानंतर, दुसऱ्या दिवशी, पाकिस्तान आणखी १५ अणुबॉम्ब टाकेल. भारत प्रत्युत्तर देईल आणि पाकिस्तानच्या लष्करी प्रतिष्ठानांवर आणि अण्विक तळांवर २० अणुबॉम्ब टाकेल. या स्फोटांमुळे हिरोशिमावरील बॉम्बहल्ल्यासारखे विनाशकारी परिणाम जगावर होतील.

तिसऱ्या दिवशी पाकिस्तान भारतीय चौक्या, नौदल तळ आणि शहरी हवाई क्षेत्रांवर ३० हवाई हल्ले करेल, तसेच आणखी १५ सामरिक हल्ले करेल. भारत पाकिस्तानच्या लष्करी तळांवर अणुहल्ले करून प्रत्युत्तर देईल. पुढील तीन दिवसांत पाकिस्तान आपल्या संपूर्ण अण्वस्त्रांचा वापर करेल आणि भारतातील प्रमुख शहरांना लक्ष्य करेल, असा संशोधकांना भीती आहे. भारतही प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या लष्करी तळांवर अणुहल्ले करेल. या संपूर्ण घटनेमुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड विनाश होईल आणि लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

इतके लोक जागीच ठार होऊ शकते

भारत आणि पाकिस्तानमध्ये अणूयुद्ध झाले तर सुमारे ५० ते १२५ दशलक्ष लोक तात्काळ मारले जाऊ शकतात. पाकिस्तान आणि भारतातील प्रमुख शहरे पूर्णपणे नष्ट होतील किंवा राहण्यायोग्य राहणार नाहीत. शिवाय, पायाभूत सुविधांचा पूर्णपणे नष्ट होईल, ज्यामुळे आरोग्य सेवा, वाहतूक, ऊर्जा आणि वित्तीय संस्थांवर परिणाम होईल. याशिवाय, युद्धानंतर निर्माण होणारा धूर आणि एसिडचा पाऊस यांचाही हवामानावर भयानक परिणाम होईल. यामुळे जागतिक दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्याचा परिणाम अब्जावधी लोकांवर होऊ शकतो.

या संशोधनाचा संदेश काय आहे?

या संशोधनाचा संदेश काय आहे? या संशोधनात असा इशारा देण्यात आला आहे की भारत आणि पाकिस्तानमधील अणुयुद्धाचे परिणाम केवळ या दोन देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी विनाशकारी परिणाम होऊ शकतात. दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे आहेत आणि जर त्यांचा वापर झाला तर लाखो लोक मारले जातील आणि त्याचा संपूर्ण जगाच्या पर्यावरणावर आणि जीवनशैलीवर विनाशकारी परिणाम होईल.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.