AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयप्रकाश बाबू जळती मशाल घेऊन संघ कार्यालय जाळण्यासाठी आले होते, पण आणीबाणीनंतर… मोहन भागवत यांनी सांगितलेला किस्सा काय?

आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी आरएसएसच्या 100 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना एक खास किस्सा सांगितला आहे. भागवत यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

जयप्रकाश बाबू जळती मशाल घेऊन संघ कार्यालय जाळण्यासाठी आले होते, पण आणीबाणीनंतर... मोहन भागवत यांनी सांगितलेला किस्सा काय?
mohan bhagwat
| Updated on: Aug 28, 2025 | 9:28 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आरएसएस ही एक हिंदू समाजासाठी काम करणारी संघटना आहे असे म्हटले जाते. तसेच ही संघटना मुस्लिमविरोधी आहे असाही प्रचार केला जातो. मात्र आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी आता मुस्लिम लोकांबाबत केलेले एक विधान आता चर्चेत आले आहे. आरएसएसच्या 100 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी एक किस्साही सांगितला आहे याबाबत माहिती जाणून घेऊयात.

मोहन भागवत यांनी एक किस्सा सांगताना म्हटले की,’1948 मध्ये जयप्रकाश बाबू हातात जळती मशाल घेऊन संघ कार्यालय जाळण्यासाठी गेले होते. मात्र आणीबाणीनंतर ते संघाच्या शिक्षा वर्गात आले त्यावेळी त्यांनी बदलाची आशा फक्त तुमच्याकडून आहे असं विधान केले आहे. पुढे धर्मांतर आणि बेकायदेशीर घुसखोरीबाबतच्या प्रश्नांवर बोलताना भागवत यांनी मोठं विधान केलं आहे.

मुस्लिम लोकांनी कमीत कमी 3 मुले जन्माला घालावीत

पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले की, ‘भारतातील लोकसंख्या संतुलन बदलण्यासाठी तीन घटक जबाबदार आहेत. पहिला घटक म्हणजे धर्मांतर, जे परंपरेविरुद्ध आहे. काही मुस्लिम उलेमांनी मला असं सांगितलं की, इस्लाममध्ये जबरदस्तीने धर्मांतर करणे पाप आहे. दुसरा घटक म्हणजे बेकायदेशीर स्थलांतर, यामुळे रोजगार आणि सामाजिक तणाव निर्माण होतो. तिसरा घटक म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर, यात संतुलन गरजेचे आहे. मुस्लिम लोकांनी कमीत कमी 3 मुले जन्माला घालावीत, यामुळे समाजात असंतुलन निर्माण होणार नाही.’

इस्लाम राहणार नाही असं आम्ही म्हटलं नाही – भागवत

मोहन भागवत पुढे बोलताना म्हणाले की, ‘आम्ही कधीही म्हटले नाही की इस्लाम भारतात राहणार नाही. कारण जातीवाद हा आपल्या विकासात अडथळा आहे. त्यामुळे जातीवादाला महत्व न देता प्रत्येकाने एकमेकांच्या घरी येणे-जाणे करावे. कारण प्रत्येकाचा DNA सारखाच आहे. शोषणमुक्त समाज असावा अशी आमची भूमिका आहे. आमचे स्वयंसेवक कधीही अत्याचार करू शकत नाहीत असंही मोहन भागवत यांनी सांगितलं.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!