TVK Vijay : 2021 चा तो गेम चेंजर निर्णय, तिथेच विजयला कळलं की तामिळनाडूच्या राजकारणाचा तो बॉस बनू शकतो
TVK Vijay : थलपती विजयने तामिळनाडूच्या राजकारणात मोठा चमत्कार केला आहे. सगळ्या देशात विजयच्या या राजकीय यशाची चर्चा आहे. दोन वर्षांपूर्वी आलेला हा पक्ष इतक्या कमीवेळात तामिळ राजकारणात सत्तेपर्यंत कसा पोहोचला? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. विजयने ही कमाल एकारात्रीत केलेली नाही. त्यामागची रचना काय होती? किती वर्ष मेहनत केली? त्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.

काल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात दोन राज्यांचे निकाल खूप वैशिष्ट्य पूर्ण ठरले. देशात त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे. एक म्हणजे पश्चिम बंगाल आणि दुसरं तामिळनाडू. पश्चिम बंगालमध्ये भाजपने पहिल्यांदा पूर्ण बहुमत मिळवलं आहे. काँग्रेस, डावे, तृणमुल काँग्रेस यांनी स्वातंत्र्यापासून पश्चिम बंगालवर राज्य केलं. हे तीन पक्ष आणि भाजपं यांच्यातला मुख्य फरक म्हणजे विचारधारा. या तिन्ही पक्षाच्या विचारात एक समानता आहे ती म्हणजे विचारधारा. भाजपने नेहमीच हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला कौल देणं म्हणजे एकप्रकारे हिंदुत्वाच्या विचारधारेवर शिक्कामोर्तब करण्यासारख आहे. त्याशिवाय पश्चिम बंगालला राजकीय हिंसाचाराची एक परंपरा आहे. डाव्यांकडून बंगाल जिंकताना ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसला आणि आता त्यांच्याकडून बंगालमध्ये सरकार आणताना भाजपला प्रचंड मोठ्या राजकीय हिंसाचाराचा सामना करावा लागला. कार्यकर्त्यांना अनेक जीवघेणे हल्ले सोसावे लागले. त्यामुळे पश्चिम बंगालमधला भाजपचा विजय ऐतिहासिक आहे. ...
