केमिकलने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे ? खाण्यापूर्वी अशी करा चाचणी
बाजारात केमिकल्सने पिकवलेल्या फळांची विक्री सर्रास होत आहे. केमिकल्सने पिकवलेले आंबे, केळी आणि पपईचा बाजारात सुळसुळाट आहे. ही फळे कॅल्शियम कार्बाईड सारख्या रसायनांनी पिकवलेले असतात. ज्यास लिव्हर आणि किडनीचे मोठे नुकसान होऊ शकते.

उन्हाळा सुरु झाला असून आंब्याचा सिझनही सुरु झाला आहे. अनेकदा आंबे घेताना ते केमिकलने पिकवलेले असतात. त्यामुळे असे आंबे किंवा इतर फळे कार्बाइडने पिकवलेले असतात. बाजारात अनेक पिवळे धमक पिकलेली फळे आपण पहातो, मात्र ती कार्बाइड या केमिकलचा वापर करुन पिकवलेली असतात. आंबेच नव्हे तर केळी, पपई देखील केमिकलने पिकवलेले असतात. त्यामुळे अशी फळे ओळखायची कशी ते आपण या लेखात पाहूयात… बाजारात आलेले आंबे नैसर्गिक की कृत्रिमरित्या पिकवलेले? प्रत्येक फळांचा एक सिझन असतो. सिझननुसार आलेल्या फळांचा पुरवठा जास्त असल्याने त्यांची किंमती स्थिर असतात. मात्र, अनेकदा मागणी पाहून नफेखोर व्यापारी कच्च्या फळांना कृत्रिमरित्या पिकवून ती बाजारात आणतात. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांची तीन पट कमाई होते. आंब्याच्या बाबतीत देखील हे होत असते. ...