
Bipin Rawat Helicopter Crash: देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टॉप (सीडीएस) बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघात प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. तीन वर्षानंतर आलेल्या या अपघातात मानवी चूक असल्याचे म्हटले आहे. जनरल रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर ११ जणांचा या अपघातात मृत्यू झाला होता. ही दुर्घटना पायलटच्या चुकीमुळे झालेल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या अहवालात म्हटले आहे. 8 डिसेंबर 2021 रोजी तामिळनाडूतील कुन्नूरजवळ हा अपघात झाला होता.
संसदेत संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीचा अहवाल मांडण्यात आला. या अहवालात Mi-17 V5 हेलिकॉप्टर दुर्घटना ‘ह्यूमन एरर (एयरक्रू)’ म्हणजे पायलटच्या चुकीमुळे झाल्याचे म्हटले आहे. समितीने 2017 ते 2022 दरम्यान 34 IAF हेलिकॉप्टर अपघाताची तपासणी केली. त्यातील 9 अपघात 2021-22 मधील होते. 2018-19 मध्ये 11 अपघात झाले होते.
8 डिसेंबर 2021 को जनरल रावत, उनकी पत्नी मधुलिका और 12 अन्य सशस्त्र बल कर्मी तमिलनाडु के कोयंबटूर के सुलूर एयरफोर्स बेस से वेलिंगटन के डिफेंस सर्विसेज स्टाफ कॉलेज जा रहे थे। वे Mi-17 V5 हेलीकॉप्टर में सवार थे। लैंडिंग से कुछ मिनट पहले ही हेलीकॉप्टर पहाड़ियों से टकरा गया। इस दुर्घटना में सीडीएस जनरल रावत, उनकी पत्नी और 11 अन्य लोगों की मौत हो गई थी। ग्रुप कैप्टन वरुण सिंह, शौर्य चक्र विजेता, इस हादसे में अकेले बच गए थे। लेकिन एक हफ्ते बाद इलाज के दौरान उनकी भी मौत हो गई।
समितीने आपल्या आधीच्या अहवालात म्हटले की, पहाडांमधील वातावरण अचानक बदलले. त्यानंतर हेलिकॉप्टर ढगांमध्ये गेले. त्यामुळे पायलटला दिशेचा अंदाज आला नाही. त्यामुळे ‘कंट्रोल्ड फ्लाइट इनटू टेरेन’ झाले. दुसऱ्या शब्दांत असे म्हणता येईल की, पायलटला हेलिकॉप्टर जमिनीवर आदळणार असल्याचे समजले नाही. तपासणी पथकाने फ्लाइट डेटा रिकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉयस रिकॉर्डरचे विश्लेषण केले. आता सर्व साक्षीदारांची तपासणी केल्यानंतर दुर्घटनेच्या कारणांची माहिती मिळाली आहे.
8 डिसेंबर 2021 रोजी जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह 12 सशस्त्र दलाचे कर्मचारी हेलिकॉप्टरमधून जात होते. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील सुलूर हवाई दल तळावरून ते संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाकडे जात होते. त्यांना घेऊन Mi-17 V5 हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. लँडिंगच्या काही मिनिटांपूर्वी हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले. या अपघातात सीडीएस जनरल रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 जणांचा मृत्यू झाला होता. शौर्य चक्र विजेते ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे या अपघातात बचावले होते. मात्र आठवडाभरानंतर त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.