AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Update: पाऊस संपला की सुरुच राहणार? कधी सुरु होणार थंडी जाणून घ्या

IMD Weather Update : भारतीय हवामान खात्याने देशात अनेक राज्यांमध्ये पाऊस अजूनही सक्रीय असल्याचं म्हटलं आहे. पण हा पाऊस परतीचा पाऊस आहे. त्यामुळे हा पाऊस गेल्यानंतर आता थंडीला सुरुवात कधी होणार. तापामानात घट होणार की वाढ होणार जाणून घ्या. काय आहे हवामानाची स्थिती.

IMD Weather Update: पाऊस संपला की सुरुच राहणार? कधी सुरु होणार थंडी जाणून घ्या
| Updated on: Oct 01, 2024 | 8:26 PM
Share

मान्सून अजूनही परतण्याच्या स्थितीत नाहीये. कारण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये अजूनही मान्सून सक्रिय दिसत आहे. शाची राजधानी दिल्लीत पावसाने काहीसा दिलासा दिलाय. दिल्लीत आज हलक्या पावसाचा इशारा होता. हवामान खात्याने जवळपास दहा राज्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. मध्य प्रदेशातही मान्सून सक्रिय आहे. येथे संततधार पाऊस सुरू आहे. उज्जैनमध्ये शुक्रवारी उशिरा महाकालेश्वर मंदिराच्या गेट क्रमांक चारजवळ भिंत कोसळली. ज्यामध्ये  2 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी झाले होते. देशाच्या राजधानीत मान्सून कमी सक्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना पावसापासून दिलासा मिळाला आहे. दुपारनंतर येथे तापमानात वाढ झालीये. पण शनिवारपर्यंत असाच रिमझिम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.

IMDच्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. झारखंड, किनारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये काही भागात मुसळधार पावसासह मध्यम पावसाची शक्यता आहे. या राज्यांमध्ये मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. विदर्भ, बिहार, दक्षिण मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर कोकण, गोवा आणि दक्षिण गुजरात या राज्यांचा समावेश आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ईशान्य भारताच्या काही भागात, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान, कर्नाटक, मध्य भागात रिमझिम ते मध्यम पाऊस पडेल. महाराष्ट्र, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर, अंतर्गत कर्नाटक, हरियाणा, मराठवाडा, पंजाब आणि लडाखमध्ये संथ पावसाची शक्यता आहे.

मान्सून 2024 चा हंगाम संपला असला तरी पाऊस सुरुच आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितले की, यावर्षी सरासरीपेक्षा ७.६ टक्के जास्त पाऊस झाला आहे. राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. अशा स्थितीत मान्सून संपल्यानंतर आता थंडीला सुरुवात होऊ शकते.

हवामान खात्याने मंगळवारी सांगितले की, उत्तर-पश्चिम, पश्चिम आणि मध्य भारतातील बहुतांश भागात येत्या काही दिवसांत या राज्यांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. आयएमडीनुसार, येत्या दोन-तीन दिवसांत राजस्थान, हरियाणा, पंजाबसह जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, मुझफ्फराबाद, गिलगिट बाल्टिस्तानच्या काही भागांतून मान्सूनच्या प्रस्थानासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.