AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Modi Govt | चीन-पाकिस्तान नाही, भारत आता ‘या’ देशाला शिकवणार धडा

Modi Govt | व्यापार करु पण त्याआधी सांगितलेलं काम पहिलं करा, भारताने इतका आक्रमक पवित्रा घेणं सुद्धा स्वाभाविक आहे. नुकतच G20 परिषदेसाठी या देशाचे प्रमुख भारतात आले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली होती.

Modi Govt | चीन-पाकिस्तान नाही, भारत आता 'या' देशाला शिकवणार धडा
Modi Govt
| Updated on: Sep 16, 2023 | 12:25 PM
Share

नवी दिल्ली : भारताच चीन आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांबरोबर फारस सख्य नाहीय. हे दोन्ही देश नेहमीच भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे आज जगातील अनेक देशांसोबत चांगले संबंध आहेत. देश पातळीवर व्यापार, सहकार्य या माध्यमातून हे संबंध अधिक दृढ होत आहेत. त्याचवेळी जगात असाही एक देश आहे, ज्यांच्याबरोबर भारताचे संबंध खराब होतायत. कारण हा देश सातत्याने भारतविरोधी शक्तींना खतपाणी घालतोय. त्यामुळे भारत सरकारने या देशाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. भारताचे कॅनडा बरोबरचे संबंध बिघडत चालले आहेत. दोन्ही देशाच्या संबंधात तणाव वाढत चालला आहे. भारत-कॅनडामध्ये व्यापार करार फायनल होणार होता. पण आता हा विषय बाजूला पडण्याची शक्यता आहे. या एग्रीमेंटवर चर्चा करण्यासाठी पुढच्या महिन्यात एक ट्रेड मिशन भारतात येणार होतं.

पण आता जस्टिन ट्रूडो सरकारने या ट्रेड मिशनचा दौरा स्थगित केला आहे. व्यापार मंत्रालयाने कुठलही कारण दिलेलं नाही. भारतही कॅनडासोबत हे ट्रेड एग्रीमेंट करण्यास तयार नाहीय. व्यापार मंत्री पीयूष गोयल यांनी एका मुलाखतीमध्ये कॅनडाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ‘आम्हाला काही मुद्यांवर आक्षेप असून ती गंभीर बाब आहे’ असं पीयूष गोयल म्हणाले. जस्टिन ट्रूडो G20 परिषदेसाठी भारतात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी जस्टिन ट्रूडो यांना कॅनडात सुरु असलेल्या काही गोष्टींवर कारवाई करण्यास सांगितली. दोन्ही देशात राजकीय तणावाला जे कारण आहे, त्यावर कॅनडाने पहिली कारवाई करावी अशी भारत सरकारची मागणी आहे. ….तरच दोन्ही देश पुढे जाऊ शकतात

ट्रेड एग्रीमेंटवर पुढे जाण्याआधी कॅनडाने एक प्रस्ताव सादर करावा, असं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले. भारताचा कॅनडासोबतचा सर्वात मोठा मुद्दा खलिस्तान समर्थकांचा आहे. कॅनडातील राजकारणी खलिस्तान समर्थकांना खतपाणी घालतात. तिथे त्यांना आश्रय मिळतो. कॅनडातून भारतविरोधी कारवाया चालतात हा आक्षेपाचा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळेच भारतीयांच्या मनात कॅनडा आणि जस्टिन ट्रूडो यांच्याबद्दल नाराजी आहे. “‘जियोपॉलिटिकली आणि इकोनॉमिकली’ दोन्ही देश एका लाइनवर असतील, तर पुढे जाता येते” असं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले.

Follow Us
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना