India Pakistan war : घाटकोपरचे जवान मुरली नाईक ज्यांनी 5 पाकिस्तानींना ठार केले, नंतर शहीद झाले..
पाकिस्तानने जम्मू, पठानकोठ आणि उधमपूर सह अन्य सैन्य स्थळावर ड्रोन आणि क्षेपणास्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी पाकिस्तानने देशाच्या उत्तरी आणि पश्चिम क्षेत्रातील १५ स्थानांवर याच प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून भारताने त्याने चोख उत्तर दिले आहे

भारत आणि पाकिस्तानात संघर्ष सुरु झाला आहे. ऑपरेशन सिंदुर मोहिमेनंतर बिथरलेल्या पाकिस्तानी जवावांनी सीमेवरील गावात गोळीबार सुरु केला आहे. या गोळीबारात मुंबईतील घाटकोपर येथे राहाणारे मुरली नाईक शहीद झाले आहेत.काश्मिर सीमेवर झालेल्या गोळीबारात पहाटे तीन वाजता अचानक केलेल्या गोळीबारात अनेक नागरिकांचे प्राण गेले आहेत. त्यात जवान मुरली नायक यांनी साहसाचे परिसीमा गाठत पाच अतिरेक्यांना कंठस्नान घातले.त्यात एका गोळीने त्यांचा वेध घेतला आणि ते शहीद झाले आहेत.
शहीद मुरली नाईक यांनी मरेपर्यंत संघर्ष केला. आणि पाच अतिरेक्यांना ठार केले. त्यांच्या साहस आणि सर्वोच्च बलिदानाला देश कधीही विसरु शकणार नाही. ईशान्य मुंबईतील घाटकोपर पूर्व कामराज नगर येथे राहणारे आणि मुळचे आंध्रप्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील गोरंतला मंडलस्थित कल्ली थांडा, गड्ड्नथांडा पंचायत येथे राहणारे मुरली नायक यांच्या शहीद झाल्याचे वृत्त समजतात गावात सन्नाटा पसरला. संपूर्ण जिल्ह्यात वीर जवान मुरली नायक यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी एक्स वर लिहीलंय की गोरतला मंडलचे बहादूर सपूत मुरली नाईक यांच्या बलिदानाने मला तीव्र निर्माण झाले आहे. देशाच्या रक्षणासाठी त्यांना प्राण गमवावे लागले आहेत. आम्हा सर्वांना गर्व आणि दु:खाचे क्षण आहे.त्यांच्या कुटुंबाप्रती आम्ही सहवेदना व्यक्त करीत आहोत असेही चंद्राबाबू यांनी म्हटले आहे.




अंतिम यात्रेची तयारी-
शहीद जवान मुरली नाईक यांचे पार्थिव शरीर उद्या संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रशासन आणि सैन्य दलातर्फे मुरली नाईक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल रात्री पाकिस्तानने जम्मू, पठानकोठ आणि उधमपूर सह अन्य सैन्य स्थळावर ड्रोन आणि क्षेपणास्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी पाकिस्तानने देशाच्या उत्तरी आणि पश्चिम क्षेत्रातील १५ स्थानांवर याच प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून भारताने त्याने चोख उत्तर दिले आहे