आणीबाणीचे ‘खल’नायक कोण? इंदिरा गांधी की संजय गांधी?; इतका कठोर निर्णय का घेतला?

भारतात आजच्याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 'आणीबाणी' जाहीर केली होती. 25 जून 1975 च्या रात्री आणीबाणी लावण्याच्या निर्णयाला आज 49 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा स्वातंत्र्य भारतातील काळा दिवस म्हणून ओळखला जातो. 'अंतर्गत अस्थैर्या'चं कारण देत पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली होती. त्यावेळी देशात अशी काय परिस्थिती होती की पंतप्रधानांना आणीबाणीसारखा निर्णय घ्यावा लागला. जाणून घ्या.

आणीबाणीचे खलनायक कोण? इंदिरा गांधी की संजय गांधी?; इतका कठोर निर्णय का घेतला?
| Updated on: Jun 25, 2024 | 11:25 PM

सकाळची वेळ, रोजच्याप्रमाणे सर्वांचा रेडिओ सुरू होता. रेडिओ उद्घोषकाऐवजी आकाशवाणीवर देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी बोलत होत्या राष्ट्रपतींनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. काळजी करण्यासारखे काही नाही…’ इंदिरा गांधीचे हे शब्द सर्वांच्या कानावर पडले. आणीबाणी हा शब्द ऐकून सर्व देशातील जनता थक्क झाली. येणाऱ्या दिवसांमध्ये काय घडणार याची सामान्य माणसाला कल्पना नव्हती. 25 जून 1975 आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 जून 1975 ला सकाळी इंदिरा गांधींनी देशातील जनतेला याबद्दल माहिती दिली. ‘आणीबाणी’आधी देशातील परिस्थिती 1974 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झालं होतं. युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. कारण देशात महगाई वाढली होती. काँग्रेस पक्षामधील भ्रष्टाचार समोर येऊ लागला होता. या साली गुजरातचे मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांचा मोठा भ्रष्टाचार समोर आला होता. या घोटाळ्यानंतर चिमनभाई पटेल चिमनचोर म्हणून म्हटलं जात होतं. यावेळी गुजरातमधील जनता रस्त्यावर उतरली आणि सरकार...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा