अंतराळ क्षेत्रात भारताची मोठी झेप,२०३० पर्यंत वर्षाला ५० प्रक्षेपणाचे ध्येय, INSPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोयंका यांनी सर्व सांगितलं..

भारताचे स्पेश स्टेशन लवकरच अंतराळात जाईल अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता INSPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोयंका यांनी अंतराळ संशोधन संस्थेच्या कामगिरीचे कौतूक केले आहे.

अंतराळ क्षेत्रात भारताची मोठी झेप,२०३० पर्यंत वर्षाला ५० प्रक्षेपणाचे ध्येय,  INSPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोयंका यांनी सर्व सांगितलं..
Pawan K Goenka
| Updated on: Sep 06, 2026 | 6:06 PM

भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे कौतूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली येथे श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सोहळ्यात बोलताना केले होते. भारताचे स्पेश स्टेशन लवकरच अंतराळात जाईल अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता INSPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोयंका यांनी अंतराळ संशोधन संस्थेच्या कामगिरीचे कौतूक केले आहे.

येथे पोस्ट वाचा –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना साल २०४७ भारत हा आत्मनिर्भर होऊन विकसित राष्ट्र होणार यात मला किंचितही शंका नाही असे म्हटले होते. भारताचे स्पेश स्टेशन अंतराळात लवकरच झेपावले असेही त्यांनी म्हटले होते. आज भारत ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत अनेक उत्पादनांची निर्मिती करुन ती निर्यात करत आहे.

त्यानंतर आज INSPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोयंका यांनी आज एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की पाच वर्षांपूर्वी, जेव्हा भारताने आपले अंतराळ क्षेत्र खुले केले, तेव्हा आमची दोन स्पष्ट उद्दिष्टे होती. इस्रोला ( ISRO ) नवीन क्षितिजे सर करण्यास सक्षम करणे आणि आमच्या खाजगी उद्योगांना त्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी सशक्त करणे असे गोयंका यांनी म्हटले आहे.

आज आपण ही दोन्ही उद्दिष्टे गोष्टी प्रत्यक्षात उतरताना पाहत आहोत. EOS-05 हे इस्रोचे एक मोठे यश आहे आणि ही तर केवळ सुरुवात आहे. तसेच, पाच वर्षांपूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असलेली अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सची संख्या आज ४५० च्या वर पोहोचली आहे. भारताचे खाजगी उद्योगाने तयार केलेले रॉकेट अंतराळ कक्षेत पाठवून भारत आता अंतराळ क्षेत्रात खाजगी सहभागाच्या मदतीने अनेक मोहिमा राबवण्यास सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इस्रोचे संशोधन नवीन क्षितिजे गाठण्याचे कार्य करत राहील. खाजगी उद्योगांनी इस्रोच्या मदतीने मोठ्या प्रमाणावरील उत्पादनात केले पाहिजे. अधिक रॉकेट्स, अधिक उपग्रह, अधिक प्रक्षेपण क्षमता आणि नवीन तंत्रज्ञान त्यासाठी उपयुक्त आहे. अशा प्रकारे आपण एक संपूर्ण अंतराळ परिसंस्था ( ecosystem ) उभारू आणि आपल्या महत्त्वाकांक्षेला साजेशी क्षमता निर्माण करू असेही त्यांनी म्हटले आहे.

आपल्यासमोर प्रचंड मोठी संधी आहे. भारतात निर्मिती करणे, भारतातून प्रक्षेपण करणे आणि भारतातून जगाला सेवा देणे या सूत्रींवर काम सुरु असून भारताच्या अंतराळ क्षेत्राला एका नवीन कक्षेत नेण्याच्या दिशेने लाक्षणिक आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही अर्थांनी. आपण वेगाने वाटचाल करत आहोत असेही गोयंका यांनी म्हटले आहे.

सरकार -खाजगी उद्योग मिळून भविष्य घडवणार

INSPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोयंका पुढे म्हणतात की आता खरी कसोटी व्याप्ती वाढवण्याची (स्केलिंग अप) आहे. आम्ही २०३० पर्यंत वर्षाला ५० प्रक्षेपण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील उद्दिष्ट केवळ एका संस्थेद्वारे साध्य होऊ शकत नाही. सरकार आणि खाजगी उद्योगांना मिळून हे भविष्य घडवावे लागेल असेही गोयंका यांनी म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us