रेल्वेच्या या 40 स्टेशनवर प्रवाशांना मिळणार खास सोयीसुविधा, रेल्वेची नवी योजना काय आहे…

पुनर्विकासाचे काम येत्या 5 महिन्यांमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे. देशभरातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासामुळे रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला चांगलाच वेग मिळणार आहे.

रेल्वेच्या या 40 स्टेशनवर प्रवाशांना मिळणार खास सोयीसुविधा, रेल्वेची नवी योजना काय आहे...
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 4:45 PM

नवी दिल्लीः भारतीय रेल्वे देशभरातील रेल्वे स्थानकांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने प्रचंड वेगाने काम करत आहे.रेल्वे मंत्रालयानेही देशभरातील प्रमुख स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाची आता घेतली आहे. भारतीय रेल्वेमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 40 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यामध्ये 14 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

यावरील पुनर्विकासाचे काम येत्या 5 महिन्यांमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे. देशभरातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासामुळे रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला चांगलाच वेग मिळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

या स्थानकांच्या पुनर्विकासात भारतीय रेल्वेने प्रचंड छतावरील प्लाझा, फूड कोर्ट, वेटिंग लाउंज, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, स्थानिक उत्पादनांसाठी खास जागांची सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.

विकासकामांमुळे रेल्वे स्थानक मेट्रो, बस इत्यादी वाहतुकीच्या विविध साधनांशी जोडले जाणार आहे. त्याच बरोबर शहराच्या दोन्ही बाजूंना स्थानकाशी जोडले जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

यासोबतच स्टेशनच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये ‘दिव्यांगजन’साठी ग्रीन बिल्डिंग तंत्रज्ञान आणि इतर सुविधांचा अवलंब करता येणार आहे. प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा बुद्धिमान इमारतीच्या संकल्पनेवर स्थानके विकसित केली जाणार आहेत.

स्थानकाचा पुनर्विकास रेल्वे प्रवाशांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी स्टेशनवर ‘सिटी सेंटर’ सारख्या सुविधा विकसित करण्यात येणार आहे.

सार्वजनिक खाजगी भागीदारीअंतर्गत आनंद विहार टर्मिनलसह 16 स्थानकांच्या पुनर्विकासासाठी रेल्वे निविदा काढणार आहे. पुनर्विकासाच्या इतर स्थानकांमध्ये तांबरम, विजयवाडा, दादर, कल्याण, ठाणे, अंधेरी, कोईम्बतूर जंक्शन, पुणे, बंगळुरू शहर, वडोदरा, भोपाळ, चेन्नई सेंट्रल, दिल्ली हजरत निजामुद्दीन यांचा स्थानकांचा समावेश आहे.

पश्चिम मध्य रेल्वेच्या राणी कमलापती स्थानक, पश्चिम रेल्वेचे गांधीनगर राजधानी स्थानक आणि दक्षिण पश्चिम रेल्वेचे सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल स्थानक विकसित केले जाणार आहे.

ज्या रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे, त्यामध्ये अयोध्या, बिजवासन, सफदरजंग, गोमतीनगर, तिरुपती, गया, उधना, सोमनाथ, एर्नाकुलम, पुरी, न्यू जलपाईगुडी, मुझफ्फरपूर, लखनौ (चारबाग), डाकनिया तलाव, कोटा, जम्मू तवी, जालंधर कँट, नेल्लोर, साबरमती, फरिद भुवन, जयपूर, साबरमती , कोल्लम, उदयपूर शहर, जैसलमेर, रांची, विशाखापट्टणम, पुडुचेरी, कटपाडी, रामेश्वरम, मदुराई, सुरत, जोधपूर, चेन्नई एग्मोर, न्यू भुज यांचा समावेश असणार आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.