AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup: भारत-पाकिस्तान सामने रद्द करा, दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संतप्त

India vs Pakistan boycott : आशिया चषकासाठी भारताने पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला. त्यानंतर आता अनंतनागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान संघावर बहिष्कार टाकावा अशी मागणी युजर्स करत आहेत.

Asia Cup: भारत-पाकिस्तान सामने रद्द करा, दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संतप्त
shailesh musale
shailesh musale | Updated on: Sep 14, 2023 | 8:13 PM
Share

मुंबई : अनंतनागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन भारतीय जवान शहीद झाले आहेत. याबाबत देशभरात संतापाची लाट आहे. केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंह यांनी ही  अनंतनाग दहशतवादी हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानला एकटे पाडले पाहिजे. पाकिस्तानसोबतचे क्रिकेट सामने ही बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

व्ही.के सिंह म्हणाले की, ‘जोपर्यंत पाकिस्तानला एकटे पाडत नाही तोपर्यंत हे सामान्य राहिल. जर पाकिस्तावर दबाव आणायचा असेल तर त्यांना वेगळे पाडावे लागेल.’

अनंतनागमध्ये तीन जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे झालेल्या दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत भारतीय लष्करातील कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धौनक आणि डीएसपी हुमायून भट शहीद झाले आहेत. व्ही.के सिंह यांचे हे वक्तव्य आले आहे. ते म्हणाले, पाकिस्तानला वेगळे पाडत नाही तोपर्यंत हे होतच राहिल. पाकिस्तानी कलाकार असतील किंवा क्रिकेटर यांच्यासोबत संबंध ठेवलेच नाही पाहिजे.’

भारत-पाकिस्तान सामने रद्द होणार?

अनंतनाग बुधवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारताने तीन जवान गमावले आहेत. यामुळे देशभरातून संतापाची लाट सुरु आहे. दुसरीकडे आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान खेळत आहेत. भारताने पाकिस्तान सोबत खेळू नये अशी मागणी ही सोशल मीडियावर होत आहे. त्यामुळे बीसीसीआय काय निर्णय़ घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पाकिस्तानसोबतचे सर्व सामने रद्द केले पाहिजे. भविष्यातील देखील पाकिस्तान क्रिकेट सोबत कोणतेही सामने खेळू नये अशी भूमिका सोशल मीडियावर युजर्स घेत आहेत.

Follow Us
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर