
देशाची सर्वात विश्वासार्ह मानली जाणारी विमान वाहतूक कंपनी इंडिगो सध्या मोठ्या संकटात सापडल्याने प्रवासी हवालदिल झाली आहे. गेल्या आठवडाभरात दोन ते तीन हजार विमान उड्डाणे रद्द झाल्याने संपूर्ण देशातील एअरपोर्टची अवस्था एसटी स्थानकासारखी झाली आहे. परंतू अखेर असे संकट का आले की देशाची सर्वात मजबूत एअरलाईनची सिस्टीम अचानक ठप्प का झाली ? का हजारो प्रवाशांना एअरपोर्टवर अडकून पडावे लागले ? कसे काय एका पाठोपाठ इतकी स्थिती ओढवली ? चला विस्ताराने वाचूया…संपूर्ण कहाणी… कसे वाढले इंडिगोचे संकट? गेल्या काही दिवसांपासून इंडिगोने फ्लाईट लेट झाल्याने आणि छोट्या तांत्रिक बिघाडाशी लढत आहे. एअरलाईन याला कधी हवामान, तर कधी एअरपोर्टवरील गर्दीला जबाबदार मानले जात होते. परंतू खरे कारण नंतर पुढे आले. सरकारने फ्लाईट ड्यूटी टाईम लिमिटेशन(FDTL)चे नवे नियम लागू केल्यानंतर हा गोंधळ उडाला. या नियमांमागे पायलटना थकव्यापासून वाचवणे हा हेतू होता. परंतू आधी कर्मचाऱ्यांची कमतरता असलेल्या...