AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानमध्ये होणार जलसंकट, सिंधू नदीवरील 4 योजनांचा कामांना वेग, वुलर बॅरेजही बनवणार

Indus Water Treaty: काश्मीरमधील ज्या योजनांवर वेगाने काम सुरु आहे, त्यात १००० मेगावॅटचा पाकल दुल, ६२४ मेगावॅटचा किरु प्रकल्प, ५४० मेगावॅटचा क्वार आणि ८५० मेगा वॅटचा रतले प्रकल्पाचा समावेश आहे. या सर्व योजना चिनाब नदीवर आहेत.

पाकिस्तानमध्ये होणार जलसंकट, सिंधू नदीवरील 4 योजनांचा कामांना वेग, वुलर बॅरेजही बनवणार
indus projects
| Updated on: Jul 18, 2025 | 9:00 AM
Share

Indus Water Treaty: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केला आहे. भारतातून पाकिस्तानला जाणाऱ्या ३ नद्यांचे पाणी थांबवले जात आहे. त्यासाठी जम्मू-काश्मीरमधील चार जलविद्युत योजनांवर वेगाने काम सुरु आहे. तसेच अन्य दोन योजनांचा आराखड्यास मंजुरी देण्यात येणार आहे. त्याचा परिणाम पाकिस्तानवर होणार आहे. पाकिस्तानमध्ये जलसंकट निर्माण होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर १९६० पासून कार्यरत असलेला सिंधू जलकरार भारताने स्थगित केला होता.

चार योजनांच्या कामांना वेग

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या योजनांवर वेगाने काम सुरु आहे, त्यात १००० मेगावॅटचा पाकल दुल, ६२४ मेगावॅटचा किरु प्रकल्प, ५४० मेगावॅटचा क्वार आणि ८५० मेगा वॅटचा रतले प्रकल्पाचा समावेश आहे. या सर्व योजना चिनाब नदीवर आहेत. या सर्व योजनांच्या कामांना वेग घेतला असून पूर्ण करण्याची डेडलाइन कमी करण्यात आली आहे. या योजना आता मे २०२६ ते जुलै २०२८ दरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे.

रतले प्रकल्प २०२६ मध्ये पूर्ण?

रतले जलविद्युत प्रकल्प मे २०२६ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. रतले जलविद्युत पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ही कंपनी राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा महामंडळ (NHPC) आणि जम्मू आणि काश्मीर राज्य वीज विकास महामंडळ (JKSPDC) यांच्या संयुक्त उपक्रम म्हणून कार्यरत आहे.

वुलर बॅरेजचे काम सुरु होणार

ऊर्जा मंत्रालयाने वुलर बॅरेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळबुल नेव्हिगेशन प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे मूल्यांकन देखील सुरू केले आहे. यापूर्वी ही योजना पाकिस्तानने घेतलेल्या आक्षेपांमुळे १९८७ मध्ये स्थगित केली होती. परंतु २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर १९६० चा पाणी करार स्थगित केल्यानंतर भारताने या प्रकल्पांशी संबंधित माहिती शेअर करणे थांबवले आहे. यामुळे वुलर बॅरेजला चालना मिळणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेला लवकरच मंजुरी मिळणार आहे. सन २०२६ मध्ये या योजनेच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....