AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानमध्ये होणार जलसंकट, सिंधू नदीवरील 4 योजनांचा कामांना वेग, वुलर बॅरेजही बनवणार

Indus Water Treaty: काश्मीरमधील ज्या योजनांवर वेगाने काम सुरु आहे, त्यात १००० मेगावॅटचा पाकल दुल, ६२४ मेगावॅटचा किरु प्रकल्प, ५४० मेगावॅटचा क्वार आणि ८५० मेगा वॅटचा रतले प्रकल्पाचा समावेश आहे. या सर्व योजना चिनाब नदीवर आहेत.

पाकिस्तानमध्ये होणार जलसंकट, सिंधू नदीवरील 4 योजनांचा कामांना वेग, वुलर बॅरेजही बनवणार
indus projects
| Updated on: Jul 18, 2025 | 9:00 AM
Share

Indus Water Treaty: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केला आहे. भारतातून पाकिस्तानला जाणाऱ्या ३ नद्यांचे पाणी थांबवले जात आहे. त्यासाठी जम्मू-काश्मीरमधील चार जलविद्युत योजनांवर वेगाने काम सुरु आहे. तसेच अन्य दोन योजनांचा आराखड्यास मंजुरी देण्यात येणार आहे. त्याचा परिणाम पाकिस्तानवर होणार आहे. पाकिस्तानमध्ये जलसंकट निर्माण होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर १९६० पासून कार्यरत असलेला सिंधू जलकरार भारताने स्थगित केला होता.

चार योजनांच्या कामांना वेग

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या योजनांवर वेगाने काम सुरु आहे, त्यात १००० मेगावॅटचा पाकल दुल, ६२४ मेगावॅटचा किरु प्रकल्प, ५४० मेगावॅटचा क्वार आणि ८५० मेगा वॅटचा रतले प्रकल्पाचा समावेश आहे. या सर्व योजना चिनाब नदीवर आहेत. या सर्व योजनांच्या कामांना वेग घेतला असून पूर्ण करण्याची डेडलाइन कमी करण्यात आली आहे. या योजना आता मे २०२६ ते जुलै २०२८ दरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे.

रतले प्रकल्प २०२६ मध्ये पूर्ण?

रतले जलविद्युत प्रकल्प मे २०२६ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. रतले जलविद्युत पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ही कंपनी राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा महामंडळ (NHPC) आणि जम्मू आणि काश्मीर राज्य वीज विकास महामंडळ (JKSPDC) यांच्या संयुक्त उपक्रम म्हणून कार्यरत आहे.

वुलर बॅरेजचे काम सुरु होणार

ऊर्जा मंत्रालयाने वुलर बॅरेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळबुल नेव्हिगेशन प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे मूल्यांकन देखील सुरू केले आहे. यापूर्वी ही योजना पाकिस्तानने घेतलेल्या आक्षेपांमुळे १९८७ मध्ये स्थगित केली होती. परंतु २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर १९६० चा पाणी करार स्थगित केल्यानंतर भारताने या प्रकल्पांशी संबंधित माहिती शेअर करणे थांबवले आहे. यामुळे वुलर बॅरेजला चालना मिळणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेला लवकरच मंजुरी मिळणार आहे. सन २०२६ मध्ये या योजनेच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.