AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ADITYA-L1 : सूर्याच्या दिशेने झेप, ‘आदित्य-एल1’ अंतराळात झेपावलं; भारत पुन्हा इतिहास घडवणार?

ADITYA-L1 : चांद्रयान मोहीम यशस्वी केल्यानंतर आता भारताने आणखी एक महत्त्वाची मोहीम हाती घेतली आहे. भारताने थेट सूर्यावर जाण्याचा महत्त्वकांशी प्रकल्प हाती घेतला आहे. भारताचं हे मिशन आजपासून सुरू झालं.

ADITYA-L1 : सूर्याच्या दिशेने झेप, 'आदित्य-एल1' अंतराळात झेपावलं; भारत पुन्हा इतिहास घडवणार?
| Updated on: Sep 02, 2023 | 12:09 PM
Share

बंगळुरू | 2 सप्टेंबर 2023 : चांद्रयान मोहीम यशस्वी केल्यानंतर आता भारताने आणखी एक महत्त्वाची मोहीम हाती घेतली आहे. भारताने थेट सूर्यावर जाण्याचा महत्त्वकांशी प्रकल्प हाती घेतला आहे. भारताचं हे मिशन आजपासून सुरू झालं. श्रीहरीकोटा येथून भारताचं ADITYA-L1 हे यान सूर्याच्या दिशेने झेपावलं आहे. भारताची ही पहिलीच सौर मोहीम आहे. त्यामुळे भारताची ही मोहीम यशस्वी होते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बंगळुरू येथील श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अंतराळ संस्थेतून आज सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी हे आदित्य एल1 हे यान सूर्याच्या दिशेने झेपावलं. सूर्याच्या भोवती परिक्रमा करून सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये एल-1 पॉईंट स्थापन करणं हा या मिशनचा हेतू आहे. हे भारताचं पूर्ण सौर मिशन आहे. या मिशनमुळे सौर मोहीम करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश झाला आहे.

पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाणार

आदित्य एल 1 हे यान लॉन्च केलं गेलं आहे. आता हे यान अनेक टप्प्याने पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर करण्यात येईल. पृथ्वीला चार प्रदक्षिणा घातल्यानंतर हे यान पृथ्वापासून वेगळं होईल. त्यानंतर हे यान सूर्याच्या दिशेने पाठवलं जाणार आहे. यानाच्या लॉन्चिंगवेळी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांच्यासह केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि इस्रोचे अनेक शास्त्रज्ञ उपस्थित होते.

125 दिवसानंतर

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवल्यानंतर भारताने आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. इस्रोने आदित्य एल 1 लॉन्च केलं. स्पेस स्टेशनमधून हे यान यशस्वीरित्या अंतराळात झेपावलं आहे. आज लॉन्चिंग झाल्यानंतर हे यान 125 दिवसानंतर एल-1 पॉइंटपर्यंत पोहोचेल. त्यानंतर आदित्य एल 1 हे तिथून महत्त्वाचा डेटा पाठवणार आहे. त्यावरून अनेक महत्त्वाची माहिती मिळणार आहे.

नवा इतिहास घडणार

भारताने चांद्रयान मोहीम यशस्वी केली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा भारताला नवा इतिहास रचण्याची संधी मिळाली आहे. सौर मिशनमधून केवळ भारतालाच नव्हे तर जगाला अत्यंत महत्त्वाची माहिती मिळणार आहे. सूर्याबाबतच्या संशोधनाला नवी कलाटणीही मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भारताने हे मिशन हाती घेतलं आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत