AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेहरुंमुळे चीनला संयुक्त राष्ट्राचे दरवाजे सताड उघडे; भारताने स्थायी सदस्यत्व गमावले, परराष्ट्र मंत्र्यांचा दावा काय

S. Jaishankar on Nehru : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या विधानाने मोठे वादंग उठले आहे. अर्थात भाजपच्या वतीने हा वाद काही पहिल्यांदा उकरून काढण्यात आलेला नाही. नेहरु यांच्या धोरणामुळेच चीनला संयुक्त राष्ट्राचे दार सताड उघडं झाल्याचा दावा पुन्हा करण्यात आला आहे.

नेहरुंमुळे चीनला संयुक्त राष्ट्राचे दरवाजे सताड उघडे; भारताने स्थायी सदस्यत्व गमावले, परराष्ट्र मंत्र्यांचा दावा काय
जयशंकर यांचा माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यावर हल्लाबोल
| Updated on: Apr 11, 2024 | 9:26 AM
Share

लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या प्रचाराला धार चढली आहे. त्यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर आणि त्यांच्या धोरणावर निशाणा साधला. संयु्क्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषेदत भारताला कायमस्वरुपी सदस्य म्हणून चालून आलेली संधी नेहरुंमुळे भारताने गमाविल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे चीनला ही संधी मिळाली. दहशतवादाविषयी काँग्रेस सरकारच्या भूमिकेवर पण त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. बुधवारी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात आयोजीत एका रॅलीत त्यांनी काँग्रेसच्या धोरणावर चौफेर टीका केली.

देशाचे हित पहिल्यांदा जपले असते

एस जयशंकर यांनी नेहरु यांच्या धोरणावर कडाडून टीका केली. भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (UNSC) स्थायी सदस्य व्हावा, अशी नेहरुंची इच्छा नव्हती. पूर्व पंतप्रधानांनी भारताऐवजी चीनला प्राधान्य दिले. चीन हा स्थायी सदस्य व्हावा यासाठी भूमिका घेतल्याचा जोरदार हल्लाबोल केला. मी जर पंतप्रधान असतो तर सर्वात अगोदर देशाचे हित जपले असते. देशाचे हित सर्वात अगोदर पाहिले असते असा घणाघात त्यांनी केला.

दहशतवादावर हल्लाबोल

भारत सीमेपलिकडील दहशतवाद बिलकूल सहन करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरक्षेची सर्व आव्हानं पेलल्याचा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्वी 2008 मध्ये भारतावर दहशतवादी हल्ला झाला. मुंबई हादरली. आता सीमेपलिकडून कोणतेही दहशतवादी घटना घडत असेल तर त्याला भारत उरीसारखी प्रतिक्रिया देईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

10 वर्षांत सर्वच बदलले

एस जयशंकर यांनी काँग्रेस सरकार आणि भाजप नेतृत्वातील अंतर स्पष्ट करत मोदींवर स्तुतीसुमने उधळली. गेल्या दहा वर्षांत मोठा बदल झाल्याचा दावा त्यांनी केला. आज देश मजबूत हातात असल्याचे ते म्हणाले. योग्य निर्णयामुळे योग्य दिशेने देश जात असल्याचे ते म्हणाले. आज कोणताही निर्णय घेताना आम्ही पूर्णपणे निश्चिंत असतो, कारण आम्हाला आमच्या पाठिशी शक्ती असल्याचे माहित असल्याचा दावा त्यांनी केला.

नेहरुच दोषी

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे देशाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व मिळाले नसल्याचा दावा जयशंकर यांनी केला. त्यासाठी त्यांनी नेहरूंना दोषी मानले. नेहरूंनी ही संधी भारतऐवजी चीनला दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.