AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रेनची टक्कर टाळण्यासाठी लागणार सहा वर्षे, काय आहे कारण पाहा

भारतीय रेल्वेत अपघाताचे प्रमाण मोठे आहे. ट्रेनची टक्कर टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने कवच-४ ही टक्कर विरोधी यंत्रणा विकसित केलेली आहे.

ट्रेनची टक्कर टाळण्यासाठी लागणार सहा वर्षे, काय आहे कारण पाहा
| Updated on: Nov 27, 2024 | 10:49 PM
Share

भारतीय रेल्वेत अपघातांचे प्रमाण मोठे आहे. मानवी चुकांमुळे किंवा तांत्रिक कारणाने ट्रेनचे टक्कर होऊन अनेक मोठे अपघात होत असतात, त्यात दरवर्षी हजारो प्रवाशांचे बळी जात असतात. रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेल-एक्सप्रेसची टक्कर टाळण्यासाठी टक्कर विरोधी यंत्रणा ‘कवच’ बसविण्याचे काम सुरु आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने पावले उचलली असून रोज २०० इंजिनात ही ‘कवच’ यंत्रणा बसविण्याचे टार्गेट आहे. हे काम जर याच वेगाने झाले तर संपूर्ण रेल्वे नेटवर्कवर ही यंत्रणा लागण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे.

भारतीय रेल्वे झिरो ट्रेन एक्सिडेंट आणि झिरो ट्रेन डिरेलमेंटचे टार्गेट ठरविले आहे.अलिकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की कवच-४ यंत्रणेला लोकोमोटीव्ह ( रेल्वे इंजिन ) मध्ये आणि रेल्वे रुळांवर बसविण्याचे काम प्राधान्याने केले जात आहे. येत्या सहा वर्षांत संपूर्ण भारतीय रेल्वे नेटवर्कवर ही यंत्रणा सुरु होईल असेही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

६८ वर्कशॉपमध्ये काम सुरु

रेल्वेच्या ६८ लोकोमोटीव्ह मेन्टेनन्स वर्कशॉपमध्ये कवच-४ इंस्टॉल करण्याचे काम होत आहे. पुढील सहा वर्षांत हे काम पूर्ण होईल असे रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे. आधी लोकोमोटीव्हमध्ये कवच यंत्रणा बसविण्यासाठी सुमारे पंधरा दिवस लागत होते. आता हे काम सहा दिवसात होत आहे. आता केवळ २२ तासांत एका लोकोमोटीव्हमध्ये कवच-४ यंत्रणा बसविली जात आहे.प्रत्येक वर्कशॉपमध्ये रोज १० ते १२ लोकोमोटीव्ह मध्ये कवच इंस्टॉल करण्याची क्षमता आहे. मात्र कामगार आणि इतर कारणांवर ते अवलंबून आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार रेल्वेकडे एकूण १८ हजार इलेक्ट्रीफाईज लोकोमोटीव्ह आहेत, येत्या दोन वर्षात दहा हजार लोकोमोटिव्हला कवच यंत्रणा बसविण्याची योजना आहे.तर त्यानंतर चार वर्षांत देशातील सर्व इलेक्ट्रीफाईड लोकोमोटिव्ह आणि देशातील इलेक्ट्रीफाईड रेल्वे ट्रॅकवर कवच-४ यंत्रणा लागली जाणार आहे. इलेक्ट्रीफाईड लोकोमोटीव्ह जर मेन्टेनन्ससाठी लोको वर्कशॉपमध्ये ( २४ तासांपेक्षा जास्त काळ ) आला तर त्याला लागलीच कवच-४ यंत्रणा बसवूनच बाहेर काढावे असे आदेश दिलेले आहेत.

एका इंजिनला कवच यंत्रणेचा किती येतो खर्च

रेल्वेने सध्या १५ हजार किमी रेल्वे मार्गावर कवच यंत्रणा बसविण्यासाठी टेंडर काढले आहे. यासाठी नऊ हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलेली आहे.आतापर्यंत एक हजार किलोमीटर रेल्वे ट्रॅकवर कवच यंत्रणा बसवलेली आहे. यात मुंबई, बडोदा आणि दिल्ली ते पलवल मार्गांचा समावेश आहे. एका लोकोमोटीव्हला कवच यंत्रणा लावण्याचा खर्च ८० लाख रुपये खर्च होतात. प्रति किलोमीटर रेल्वे ट्रॅकवर कवच इंस्टॉल करण्याचा खर्च ६० लाख रुपये आहे.

कसे काम करते कवच?

कवच सिस्टीमला रेल्वे रुळ आणि इंजिन दोन्ही जागी लावायला लागते.जेव्हा कवच यंत्रणा बसवलेली ट्रेन कवच यंत्रणा लावलेल्या ट्रॅकवरुन जाते तेव्हा सेंसरमुळे ट्रेनचा वेग आणि स्थान आदीची माहिती कळते. तसेच समोरुन येणाऱ्या ट्रेनची देखील सर्व माहिती कळते. दोन्ही ट्रेनचा वेग आणि कमी अंतर आदी पाहून कवच यंत्रणा आपोआप दोन्ही ट्रेन रोखते. सध्या लोको आणि रुळांना कवच बसवण्याचे काम सुरु आहे. रेल्वेने कवच यंत्रणेच्या तीन आवृत्त्यात सुधारणा करुन १६ जुलै २०२४ रोजी कवच-४ यंत्रणा शोधली आहे. आता सर्व ठिकाणी कवच-४ ही यंत्रणा बसविली जात आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.