AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोट्यवधी मराठी भाषिकांची ‘ती’ इच्छा मी पूर्ण केली, पंतप्रधान मोदी नेमकं कशाबद्दल म्हणाले?

नवी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी मराठी भाषेतील भक्ती, शक्ती आणि युक्तीचे कौतुक केले आणि तिच्या सांस्कृतिक योगदानावर प्रकाश टाकला. संमेलनात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.

कोट्यवधी मराठी भाषिकांची 'ती' इच्छा मी पूर्ण केली, पंतप्रधान मोदी नेमकं कशाबद्दल म्हणाले?
pm narendra modi
| Updated on: Feb 21, 2025 | 6:34 PM
Share

राजधानी नवी दिल्लीत आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकंतच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जोरदार भाषण केले. मराठीत भक्ती आहे, शक्ती आहे आणि युक्तीही आहे. संघामुळेच मला मराठी भाषा अवगत झाली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भाषा केवळ संवादाचं माध्यम नाही

“संघामुळेच मला मराठी भाषा अवगत झाली. काही दिवसापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. देश आणि जगात १२ कोटीहून अधिक मराठी भाषिक लोक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही कोट्यवधी मराठी भाषिकांची इच्छा होती. दशकांपासून हे काम अपूर्ण होतं. मला ते पूर्ण करण्याची संधी मिळाली. हे माझं भाग्य आहे. भाषा केवळ संवादाचं माध्यम नाही. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. भाषा समाजात जन्म घेत असते. पण भाषा समाजाच्या निर्माणात तेवढीच महत्त्वाची भूमिका निभावते”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.

मराठीत भक्ती, शक्ती आणि युक्तीही आहे

“मराठीने सांस्कृतिक निर्माण केलं आहे. रामदास स्वामी म्हणायचे मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा” “आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे” “महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे” मराठीत सौंदर्य आहे, संवेदना आहे. समानता आहे आणि समरसता आहे. त्यात अध्यात्मिकतेचे स्वर आहेत आणि आधुनिकता आहे. मराठीत भक्ती आहे, शक्ती आहे आणि युक्तीही आहे. भारताला अध्यात्मिक ऊर्जेची गरज पडली. तेव्हा मराठी संतांनी ऋषींच्या तत्वज्ञानाला सोप्या भाषेत सांगितलं. महाराष्ट्रातील कितीतरी संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून मराठी भाषेतून समाजाला नवीन दिशा दाखवली. आधुनिक काळात ग दी माडगुळकर आणि सुधीर फडक्यांच्या गीत रामायणाने जो प्रभाव टाकला तो सर्वांना माहीत आहे”, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

“सर्व भाषांमधील शिक्षणाला प्रोत्साहन”

“मराठीने इतर भाषेतील साहित्य घेतलं आणि त्या भाषांनाही समृद्ध केलं. मामा वरेरकरांनी आनंद मठाचं भाषांतर केलं. विंदा करंदीकर यांचं साहित्य तर किती तरी भाषेतत् गेलं. भारतीय भाषांमध्ये कधीच वैर राहिलं नाही. भाषने नेहमीच एक दुसऱ्यांना आपलंसं केलं आहे. एकमेकांना समृद्ध केलं आहे. पण अनेकदा भाषेच्या नावाने भेद भाव केला जातो. तेव्हा आपल्या भाषेतून उत्तर दिलं जातं. या भेदभावापासून दूर राहिलं पाहिजे. भाषा जपल्या पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. आपण सर्व भाषांमधील शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे”, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

“आपलं साहित्य समाजाचा आरसा असतं. साहित्य समाजाचं पथप्रदर्शक असतं. त्यामुळे साहित्य संमेलनासारख्या कार्यक्रमाची देशात महत्त्वाची भूमिका असते. गोविंद रानडे, हरी नारायण आपटे, आचार्य अत्रे, सावरकर यांनी आदर्श निर्माण केले आहे. साहित्य महामंडळ ही परंपरा पुढे नेईल अशी आशा करतो”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.