Operation Sindoor : पाकिस्तानमधील संपूर्ण आकाश लाल, मसूद अजहरचा मदरसा उद्ध्वस्त… बारुदचा वास

संपूर्ण आकाश लाल झाले आहे, मौलाना मसूद अजहरचा मदरसा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे आणि बारूदाचा वास पसरला आहे. भारताने मौलाना मसूद अजहरच्या मदरस्यावर चार क्षेपणास्त्रे डागली, ज्यामुळे मदरसा नष्ट झाला आणि अनेक जण जखमी झाले असे पाकिस्तानी पत्रकार बोलताना दिसत आहे.

Operation Sindoor : पाकिस्तानमधील संपूर्ण आकाश लाल, मसूद अजहरचा मदरसा उद्ध्वस्त... बारुदचा वास
masood azhar madrasa
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 07, 2025 | 7:32 AM

‘काही वेळापूर्वीच मौलाना मसूद अजहरच्या मदरस्यावर चार क्षेपणास्त्रे डागण्यात आली. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात आग भडकली आहे. मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. संपूर्ण आकाश लाल झाले आहे. अनेक लोक जखमी झाले असून त्यांना बहावलपूरच्या व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे. हे स्पष्ट आहे की चार स्फोट झाले आणि संपूर्ण मदरसा उद्ध्वस्त झाला आहे. माझे घर मसूद अजहरच्या मदरशापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. आमच्या परिसरातही स्फोटाचा परिणाम जाणवला. बारूदाचा वास येत आहे’ हे आम्ही  नाही, तर पाकिस्तानचा स्वतःचा पत्रकार हे वर्णन करत आहे.

भारताचा हल्ला

पाकिस्तान नियो न्यूजचा बहावलपूर पत्रकार सांगत आहे की, मध्यरात्री जेव्हा भारताने मौलाना मसूद अजहरच्या मदरस्यावर क्षेपणास्त्रे डागली तेव्हा तिथे काय घडले. ‘मसूद अजहरच्या ठिकाणावर डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे स्काल्प असू शकतात, जी राफेल विमानात बसवली जातात. मात्र, याबाबत अधिकृत माहिती सकाळी दहा वाजता लष्कराच्या पत्रकार परिषदेत मिळेल’ असे तो पत्रकार बोलताना दिसत आहे. दुसरीकडे, पाकिस्तानची प्रचार यंत्रणा सक्रिय झाली आहे. गाझाच्या व्हिडीओंना पाकिस्तानचे सांगून असा खोटा प्रचार केला जात आहे की मुलं मारली गेली. पण पाकिस्तानी वाहिन्या स्वतः दाखवत आहेत की, मदरशात वापरल्या जाणाऱ्या पोशाखातील लोक जखमी झाले आहेत जे जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी असावेत. रुग्णालयाबाहेर गोंधळाचे वातावरण आहे. पाकिस्तानी लष्कराने सत्य लपवण्यासाठी रस्त्यांवर बॅरिकेडिंग केले आहे.
वाचा: भारताचा सर्वात मोठा शत्रू दहशतवादी मसूद अजहर मारला गेला का? हल्ल्यात जैशचे टॉप कमांडर ठार

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काही पाकिस्तानी लिहित आहेत की, भारताने सुरुवात केली, हे जगाने लक्षात ठेवावे. तिथले पत्रकार हामिद मीर जळत्या ठिकाणांचे व्हिडिओ दाखवून लोकांना विचारत आहेत की हे कोणत्या ठिकाणचे आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी लष्कराच्या प्रचार शाखेच्या आयएसपीआरच्या महासंचालकांनी मान्य केले आहे की, सहा ठिकाणांवर 24 क्षेपणास्त्र हल्ले झाले, ज्यात 8 लोक मारले गेले आणि 35 पेक्षा जास्त जखमी झाले.

पाकिस्तानला धडा

आता पाकिस्तानने सावध व्हायला हवे. इस्लामच्या नावाखाली जिहादीला लष्करप्रमुख बनवणे आणि दहशतवादाला खतपाणी घालणे त्याच्या हिताचे नाही. यातूनच हे समजते की, भारताच्या हल्ल्यानंतर बलुचिस्तान आणि अफगाणिस्तानात दिवाळी साजरी होत आहे. पाकिस्तानची अशी अवस्था का झाली? धर्माच्या नावाखाली अस्तित्व टिकवण्यासाठी भारताचा विरोध करणे त्याच्या मुळांवर घाव घालू शकते.