AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today: रोजगार मागणारे नव्हे, देणारे व्हा; ‘अग्निपथ’ आंदोलनावर अनुराग ठाकूरांच भाष्य

कोरोनाच्या कठिण परिस्थितीत भारताने जगाला मदतीची कवाड खुली केली. कान्स चित्रपट महोत्सवात भारताला 'कंट्री ऑफ ऑनर'च्या सन्मानानं गौरविण्यात आलं.

What India Thinks Today: रोजगार मागणारे नव्हे, देणारे व्हा; ‘अग्निपथ’ आंदोलनावर अनुराग ठाकूरांच भाष्य
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
| Updated on: Jun 18, 2022 | 8:12 PM
Share

नवी दिल्लीः जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. पंतप्रधान मोंदीच्या (PM Modi) करिश्मामुळे जगभरात 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. कोरोनाच्या कठिण परिस्थितीत भारताने जगाला मदतीची कवाड खुली केली. कान्स चित्रपट महोत्सवात भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’च्या सन्मानानं गौरविण्यात आलं. भारताचं जागतिक पातळीवर स्थान दिवसागणिक वाढत असल्याचे मत केंद्रीय प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी व्यक्त केलं. टीव्ही 9 ने आयोजित केलेल्या ‘व्हॉट इंडिया थिंक टूडे’ (What India Think Today) या चर्चासत्रात मंत्री ठाकूर सहभागी झाले होते. यावेळी ठाकूर ऑलिम्पिक पासून कान्स चित्रपट महोत्सवावर भाष्य केलं. केंद्रानं उचललेल्या क्रीडा विषयक धोरणांमुळे टॉप-10 पदक विजेत्या राष्ट्रांच्या यादीत भारतीय खेळाडूंचा समावेश निश्चितच असेल असा विश्वास मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

अग्निपथ सर्वोत्तम संधी

अग्निपथ योजनेला मंत्री अनुराग ठाकूर यांनी समर्थन दिलं आहे. अग्नीवीर चार वर्षानंतर सेवेतून बाहेर पडल्यानंतर वेतनाचे 20-25 लाख व अतिरिक्त 11 लाख रुपये मिळतील. अग्नीवीरांपैकी 25% उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल व 75% उमेदवारांना खासगी क्षेत्रात सामावून घेतले जाईल असे सांगत मंत्री ठाकूर यांनी अग्निपथ योजनेला होत असलेल्या वाढत्या विरोधाबद्दल स्पष्टीकरण देताना मत व्यक्त केलंय.

रोजगार देणारे बना

बेरोजगारीच्या मुद्द्यावर मंत्री ठाकूर यांनी रोजगार मागणाऱ्यांपेक्षा रोजगार देणारे व्हा अशी भूमिका मांडली आहे. कोविड संकटात भारतीय अर्थव्यवस्थेची वेगानं प्रगती होत आहे. भारतात कृषी संबंधित खतांच्या स्थिर आहे. जगभरात किंमतीनी उच्चांक गाठला असताना सरकारनं किंमती स्थिर राखण्याचं आव्हान पेललं. शेतकऱ्यांवर अतिरिक्त भार निर्माण होऊ दिला नाही असे मत मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केलं.

ऑलिम्पिकमध्ये भारत झळकणार

केद्रानं क्रीडा धोरणाला बळकटी देण्यासाठी धोरणात्मक पावलं उचलली आहे. कोविड काळात प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीत भारतीय खेळाडूंनी पदकाची लयलूट केली. मोदी सरकार प्रशिक्षणापासून खेळाडूंच्या सर्व खर्चाचा भार उचलते. वर्ष 2032, वर्ष 2036 आॕलिम्पिक डोळ्यासमोर ठेऊन सरकारनं रणनीती आखली आहे.

100 बिलियन डॉलरची इंडस्ट्री

भारतीय सिनेमांच्या बदलत्या स्थितीवर मंत्री ठाकूर यांनी भाष्य केलंय. सिनेमाचा कंटेट मध्यवर्ती आहे. वर्ष 2030 मध्ये भारतीय सिनेमा उद्योगाची उलाढाल 100 बिलियन डॉलरवर पोहोचणार असल्याचं मत मंत्री ठाकूर यांनी व्यक्त केलं. आगामी काळात भारत कंटेटच हब बनणार आहे. ओटीटी प्लॕटफॉर्मवर वाढता प्रतिसाद मिळत आहे. मात्र, नियमनाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करीत मंत्री ठाकूर यांनी कायद्याकडे बोट दाखवलं.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.