AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon : मान्सूनबाबत सर्वात मोठी बातमी! तब्बल 5 दिवस… या तारखेला केरळमध्ये दाखल होणार

Monsoon Update : मान्सूनबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. यंदा नैऋत्य मान्सून केरळमध्ये तब्बल 5 दिवस आधी दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Monsoon : मान्सूनबाबत सर्वात मोठी बातमी! तब्बल 5 दिवस... या तारखेला केरळमध्ये दाखल होणार
Monsoon RainImage Credit source: Google
| Updated on: May 15, 2026 | 8:40 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशातील तापमानात वाढ झाली असून प्रचंड उकाडा जाणवत आहे. अशातच आता मान्सूनबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. यंदा नैऋत्य मान्सून केरळमध्ये तब्बल 5 दिवस आधी दाखल होणार असून, त्यानंतर हळूहळू संपूर्ण देशभर मान्सूनचा विस्तार होणार आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागात वेळेआधीच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या मान्सूनबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या तारखेला केरळमध्ये दाखल होणार

मान्सून साधारणपणे केरळमध्ये 1 जूनला पोहोचतो, मात्र यंदा तो तब्बल 5 दिवस आधी म्हणजे 26 मे रोजीच दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा दक्षिण-पश्चिम मान्सून 20 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटावर दाखल होईल. त्यानंतर तो पश्चिमेकडे सरकत भारतात पुढे येईल आणि 26 मेपर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, हवामान विभागाने यावर्षी भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

5 दिवस आधी मान्सूनची एन्ट्री

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, उष्णतेचा पारा झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी हवामान विभागाने दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. गाझियाबाद आणि नोएडा येथे धुळीच्या वादळासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीच्या मते, यंदा मान्सून 5 दिवस आधी येण्याची शक्यता असली तरी पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.

यंदा पाऊस कमी का पडणार?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यावर्षी भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो. यामागे एल निनोची परिस्थिती हे संभाव्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. यंदा केवळ 80 सेंटीमीटर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. सिंचनासाठी पाण्याची कमतरता निर्माण होऊन शेतीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष चिंतेचे ठरण्याची शक्यता आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?