AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओबीसी आणि आदिवासींचा पंतप्रधान मोदी यांच्याकडून उल्लेख; नेमकं काय म्हणाले?

"प्रत्येक वंचितला वाटतं आपणच जिंकलोय. प्रत्येक शेतकऱ्यांना वाटतं ही निवडणूक शेतकरी जिंकले आहेत. आज आदिवासींना वाटतं आपण ज्याला मत दिलं त्यांचा विजय झाला. प्रथम मतदारांनाही आपल्यामुळेच विजय झाल्याचं वाटतं. प्रत्येक महिललेला आपणच विजयी झाल्याचं वाटतंय", असं नरेंद्र मोदी म्हणाले.

ओबीसी आणि आदिवासींचा पंतप्रधान मोदी यांच्याकडून उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 03, 2023 | 8:08 PM
Share

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाषण केलं. यावेळी त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भाषणात ओबीसी आणि आदिवासी यांचा उल्लेख केला. “मी वारंवार सांगत आहे. माझ्यासाठी देशात चार जातीच सर्वात मोठ्या जाती आहेत. नारीशक्ती, युवा शक्ती , शेतकरी आणि गरीब कुटुंब या चारच जाती आहेत. आपले ओबीसी साथी याच वर्गातून येतात. आज मोठ्या संख्येने आदिवासी लोक याच वर्गातून येतात. या निवडणुकीत चारही जातींनी भाजपच्या योजना आणि रोडमॅपवर उत्साह दाखवला आहे. आज प्रत्येक गरीब म्हणतोय, तो स्वत: जिंकला आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“प्रत्येक वंचितला वाटतं आपणच जिंकलोय. प्रत्येक शेतकऱ्यांना वाटतं ही निवडणूक शेतकरी जिंकले आहेत. आज आदिवासींना वाटतं आपण ज्याला मत दिलं त्यांचा विजय झाला. प्रथम मतदारांनाही आपल्यामुळेच विजय झाल्याचं वाटतं. प्रत्येक महिललेला आपणच विजयी झाल्याचं वाटतं. प्रत्येक नागरिक हे आपलं यश मानतो. जो २०४७ भारताला विकसित राष्ट्र पाहू इच्छितो”, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

‘देशातील नारी शक्तीचं अभिनंदन करतो’

“मी देशातील नारी शक्तीचं अभिनंदन करतो. रॅलीत मी सातत्याने सांगायचो. या निवडणुकीत महिला शक्ती भाजपला विजयी करणार असल्याचा निश्चय केल्याचं सांगायचो. देशातील नारी शक्ती जेव्हा ज्याचं सुरक्षा कवच बनते, तेव्हा कोणतीही ताकद त्यांना रोखू शकत नाही. नारीशक्ती वंदन अधिनियमाने महिलांच्या मनात नवा विश्वास जागवला आहे. देशातील प्रत्येक महिलेच्या मनात भरवसा निर्माण झाला आहे. भाजप सरकारमध्ये त्याची भागिदारी उंचवणार आहे, असं या महिलांना वाटतं. भाजपच महिलांचा सन्मान करू शकते असं प्रत्येक कन्येला वाटतं”, असं मोदी म्हणाले.

“गेल्या दहा वर्षात भाजपने त्यांच्यापर्यंत टॉयलेट, वीज, गॅस, पाणी, बँकेत खाती अशा सुविधा दिल्या. इमानदारीने काम केलं. भाजप कुटुंब, समाजात त्यांची आर्थिक भागीदारी वाढवण्यासाठी रोजगाराच्या संधी वाडवण्यासाठी निरंतर काम करत आहे, हे महिला पाहत आहे. नारी शक्तीचा विकास हा भाजपच्या विकास मॉडेलचा स्तंभ आहे. म्हणूनच या निवडणुकीत महिलांनी भाजपाच्या विजयाची जबाबदारी आपल्या हातात घेतली होती. आपल्याला भरपूर आशीर्वाद दिला. मी नम्रपणे देशातील महिलांना हेच सांगेल की तुम्हाला जी आश्वासनं दिली ती शत प्रतिशत पूर्ण करू. ही मोदींची गॅरंटी आहे. आणि मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Follow Us
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा.