AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओबीसी आणि आदिवासींचा पंतप्रधान मोदी यांच्याकडून उल्लेख; नेमकं काय म्हणाले?

"प्रत्येक वंचितला वाटतं आपणच जिंकलोय. प्रत्येक शेतकऱ्यांना वाटतं ही निवडणूक शेतकरी जिंकले आहेत. आज आदिवासींना वाटतं आपण ज्याला मत दिलं त्यांचा विजय झाला. प्रथम मतदारांनाही आपल्यामुळेच विजय झाल्याचं वाटतं. प्रत्येक महिललेला आपणच विजयी झाल्याचं वाटतंय", असं नरेंद्र मोदी म्हणाले.

ओबीसी आणि आदिवासींचा पंतप्रधान मोदी यांच्याकडून उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Dec 03, 2023 | 8:08 PM
Share

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाषण केलं. यावेळी त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भाषणात ओबीसी आणि आदिवासी यांचा उल्लेख केला. “मी वारंवार सांगत आहे. माझ्यासाठी देशात चार जातीच सर्वात मोठ्या जाती आहेत. नारीशक्ती, युवा शक्ती , शेतकरी आणि गरीब कुटुंब या चारच जाती आहेत. आपले ओबीसी साथी याच वर्गातून येतात. आज मोठ्या संख्येने आदिवासी लोक याच वर्गातून येतात. या निवडणुकीत चारही जातींनी भाजपच्या योजना आणि रोडमॅपवर उत्साह दाखवला आहे. आज प्रत्येक गरीब म्हणतोय, तो स्वत: जिंकला आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“प्रत्येक वंचितला वाटतं आपणच जिंकलोय. प्रत्येक शेतकऱ्यांना वाटतं ही निवडणूक शेतकरी जिंकले आहेत. आज आदिवासींना वाटतं आपण ज्याला मत दिलं त्यांचा विजय झाला. प्रथम मतदारांनाही आपल्यामुळेच विजय झाल्याचं वाटतं. प्रत्येक महिललेला आपणच विजयी झाल्याचं वाटतं. प्रत्येक नागरिक हे आपलं यश मानतो. जो २०४७ भारताला विकसित राष्ट्र पाहू इच्छितो”, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

‘देशातील नारी शक्तीचं अभिनंदन करतो’

“मी देशातील नारी शक्तीचं अभिनंदन करतो. रॅलीत मी सातत्याने सांगायचो. या निवडणुकीत महिला शक्ती भाजपला विजयी करणार असल्याचा निश्चय केल्याचं सांगायचो. देशातील नारी शक्ती जेव्हा ज्याचं सुरक्षा कवच बनते, तेव्हा कोणतीही ताकद त्यांना रोखू शकत नाही. नारीशक्ती वंदन अधिनियमाने महिलांच्या मनात नवा विश्वास जागवला आहे. देशातील प्रत्येक महिलेच्या मनात भरवसा निर्माण झाला आहे. भाजप सरकारमध्ये त्याची भागिदारी उंचवणार आहे, असं या महिलांना वाटतं. भाजपच महिलांचा सन्मान करू शकते असं प्रत्येक कन्येला वाटतं”, असं मोदी म्हणाले.

“गेल्या दहा वर्षात भाजपने त्यांच्यापर्यंत टॉयलेट, वीज, गॅस, पाणी, बँकेत खाती अशा सुविधा दिल्या. इमानदारीने काम केलं. भाजप कुटुंब, समाजात त्यांची आर्थिक भागीदारी वाढवण्यासाठी रोजगाराच्या संधी वाडवण्यासाठी निरंतर काम करत आहे, हे महिला पाहत आहे. नारी शक्तीचा विकास हा भाजपच्या विकास मॉडेलचा स्तंभ आहे. म्हणूनच या निवडणुकीत महिलांनी भाजपाच्या विजयाची जबाबदारी आपल्या हातात घेतली होती. आपल्याला भरपूर आशीर्वाद दिला. मी नम्रपणे देशातील महिलांना हेच सांगेल की तुम्हाला जी आश्वासनं दिली ती शत प्रतिशत पूर्ण करू. ही मोदींची गॅरंटी आहे. आणि मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान.
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या व्यक्तव्यावरू पुण्यात भाजप-कॉंग्रेस आमनेसामने
हर्षवर्धन सपकाळ यांच्या व्यक्तव्यावरू पुण्यात भाजप-कॉंग्रेस आमनेसामने.
पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी.
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?.