AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आवाज तेलंगणापर्यंत पोहोचला पाहिजे’, भाषणाच्या पहिल्याच वाक्यात मोदींचा काँग्रेसला टोला

"आज सबका साथ सबका विकासची भावना जिंकली आहे. आज विकसित भारतच्या आव्हानाचा विजय झालाय. आज आत्मनिर्भर भारतच्या संकल्पनेचा विजय झाला. आज वंचितांच्या विकासाच्या विचारांचा विजय झालाय. भारताच्या आणि राज्यांच्या विकासाच्या विचाराचा विजय झाला. आज प्रमाणिकता, पारदर्शकता आणि सुशासनचा विजय झालाय", असं नरेंद्र मोदी म्हणाले.

'आवाज तेलंगणापर्यंत पोहोचला पाहिजे', भाषणाच्या पहिल्याच वाक्यात मोदींचा काँग्रेसला टोला
| Updated on: Dec 03, 2023 | 7:39 PM
Share

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : देशातील चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजपला सर्वात मोठं यश मिळताना दिसत आहे. त्यामुळे या तीन राज्यांमध्ये भाजपचं एकहाती सत्ता बनण्याची शक्यता आहे. या विजयानंतर भाजपच्या गोटात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. भाजपकडून विजयानंतर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात संबोधित केलं. यावेळी त्यांनी पहिल्याच वाक्यात काँग्रेसला टोला लगावला. त्यांनी भारत माता की जय घोषणा केली. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनीदेखील घोषणाबाजी केली. यावेळी ते कार्यकर्त्यांना उद्देशून बोलले की, इतकं जोराने बोला की, आवाज तेलंगणापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांच्या या वक्तव्याला जास्त महत्त्व आहे. कारण भाजपला तेलंगणा वगळता इतर तीनही राज्यांमध्ये यश आलं आहे. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा समावेश आहे.

“आवाज तेलंगणापर्यंत पोहोचला पाहिजे… भारत माता की… भारत माता की… आजचा विजय ऐतिहासिक आहे. अभूतपूर्व आहे. आज सबका साथ सबका विकासाची भावना विजयी झालीय. आज विकसित भारताच्या आवाहानाचा विजय झालाय. आज आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय झाला. आज वंचितांना पुढे आणण्याच्या विचाराचा विजय झाला. आज भारताच्या विकासासाठी राज्याच्या विकासाच्या विचाराचा विजय झाला. आज इमानदारी, पारदर्शिकता आणि सुशासनचा विजय झालाय”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात सुरुवातीला म्हणाले.

‘तेलंगणातही भाजपाला पाठिंबा वाढतोय’

“मी या मंचावरून सर्व मतदारांना आदरपूर्वक नमन करतो. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या लोकांनी भाजपावर प्रेम दाखवलं आहे. तेलंगणातही भाजपाला पाठिंबा वाढत आहे. आपल्या कुटुंबाला एवढं प्रेम मिळतं, विश्वास मिळतो, त्यामुळे मी व्यक्तिगतरित्या अनुभव करतो की माझी जबाबदारी अधिक वाढते. आज सुद्धा माझ्या मनात हीच भावना आहे. मी आपल्या आई, बहीण, मुली आणि युवा साथी, शेतकरी आणि गरीब कुटुंबांच्या समोर त्यांनी जो निर्णय घेतला. आपल्याला समर्थन दिलं. त्याबद्दल मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतोय”, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....