AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानमध्येच रचला हल्ल्याचा कट, पहलगाम हल्ल्याबद्दल तपासात धक्कादायक माहिती, पाकिस्तान लष्कराने..

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशात प्रचंड संताप दिसला. कोणत्याही परिस्थितीमध्ये या हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी करण्यात आली. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे पाकिस्तानमधील अड्डे उद्धवस्थ करण्यात आली. आता पहलगाम हल्ल्याबद्दल मोठी माहिती पुढे येत आहे.

पाकिस्तानमध्येच रचला हल्ल्याचा कट, पहलगाम हल्ल्याबद्दल तपासात धक्कादायक माहिती, पाकिस्तान लष्कराने..
Pahalgam attack
| Updated on: Dec 16, 2025 | 8:10 AM
Share

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये हिंदू पर्यटकांना टार्गेट करत गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्याचे अनेक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली. काही व्हिडीओंमध्ये दहशतवादी थेट गोळ्या झाडताना दिसत होते. अनेक वर्षांपासून या हल्ल्याचा कट रचला जात होता. फक्त हेच नाही तर दहशतवाद्यांनी घटनास्थळी येऊन रेकी देखील केली होती. या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात मोठा संताप बघायला मिळाला. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. तपासात एका मागून एक धक्कादायक खुलासे या हल्लयाबद्दल होत आहेत. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्थ केली. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू होती. शेवटी दोन्ही देशाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी बैठक घेत शांतता करार केला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता आठ महिन्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) एक मोठे यश मिळवले असून सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये पाच संशयित आणि दोन दहशतवादी संघटनांचा समावेश आहे. पाकिस्तानस्थित लष्कर ए तैयबा (LeT) आणि द रेझिस्टन्स फ्रंट (TRF). एनआयएने 1,597 पानांचे आरोपपत्र दाखल केले. ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आले की, पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानमध्ये रचण्यात आला.

आरोपपत्रानुसार, लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि द रेसिस्टन्स फ्रंटने पहलगाम हल्ल्याचा कट रचला होता. लष्कर-ए-तैयबाचा शीर्ष कमांडर साजिद जट्ट हा या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे नमूद करण्यात आले. 2022 मध्ये त्याला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. साजिद जट्ट याला अनेक उपनावांनी ओळखले जाते.तो टीआरएफचा ऑपरेशनल प्रमुख आहे आणि काश्मीर खोऱ्यात भरती, निधी आणि घुसखोरीसारखी कामे तो करतो.

2024 मध्ये पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा आणि जून 2024 मध्ये रियासी येथे बसवर झालेल्या हल्ल्याचाही कट त्याने रचला होता. पाकिस्तानी लष्कराने भारतात दहशतावाद्यांनी घुसण्यासाठी मदत केल्याचेही सांगितले जाते. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील ताणलेले संबंध अधिकच तणावात आल्याचे बघायला मिळाले.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता