AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आशिया कप’ वर भारत-पाकिस्तान तणावाचे सावट, पाकिस्तान खेळाडूंना नाही मिळणार व्हिसा, हॉकी विश्वचषकाचे भवितव्य काय?

Pahalgam Terrorist Attack Asia Cup : जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आता आशिया कप होणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण भारत पाकिस्तानच्या खेळाडुना व्हिसा देणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

'आशिया कप' वर भारत-पाकिस्तान तणावाचे सावट, पाकिस्तान खेळाडूंना नाही मिळणार व्हिसा, हॉकी विश्वचषकाचे भवितव्य काय?
पहलगाम दहशतवादी हल्लाImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 25, 2025 | 11:20 AM
Share

जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी क्रूरतेचा कळस गाठला. त्यांनी निरपराध 26 पर्यटकांना टार्गेट केले. या घटनेने पाकिस्तान आणि भारताचे संबंध ताणल्या गेले. भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहे. तर त्यांचा व्हिसा सुद्धा रद्द करण्यात आला आहे. या नवीन घडामोडींमुळे आशिया कपवर सावट उभे ठाकले आहे. हॉकी आशिया कप हा 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर यादरम्यान बिहार येथील राजगीर येथे आयोजित करण्यात आला आहे.

हॉकी विश्वचषकाचे वेळापत्रक बदलणार?

बिहार येथील राजगीरमध्ये आशिया कप होणार आहे. हा कप म्हणजे जागतिक हॉकी फेडरेशनद्वारे घेण्यात येणाऱ्या 2026 मधील विश्वचषकासाठी पहिली पायरी असते. यामध्ये जे संघ उत्कृष्ट कामगिरी करतात, त्यांची निवड विश्वचषकासाठी करण्यात येते. या महिन्याच्या सुरूवातीला भारतीय हॉकी संघाने या टुर्नामेंटविषयी माहिती दिली होती, त्यानुसार, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, मलेशिया, चीन आणि जपान हे या स्पर्धेत सहभागी होणार होते.

इंडियन एक्सप्रेसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानसोबतचे सामने दुसर्‍या एखाद्या ठिकाणी खेळवले जाऊ शकतात. तर येत्या काही महिन्यात जर परिस्थिती सामान्य झाली तर कदाचित हे सामने येथेच खेळवले जाऊ शकतात. सध्या वेट अँड वॉच अशी परिस्थिती आहे. सरकारच्या धोरणानुसार पुढील निर्णय घेण्यात येतील असे स्पष्ट होत आहे.

हॉकी वर्ल्ड कपसाठी आशिया कप महत्त्वाचा

हॉकी वर्ल्ड कपसाठी आशिया कप महत्त्वाचा आहे. हे विश्वचषकात पोहचण्यासाठीचे तिकीट आहे. पुढील वर्षी हॉकी विश्वचषक होत आहे. नेदरलँड आणि बेल्जियम ही दोन राष्ट्र त्याचे आयोजन करत आहे. या स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान भिडतील तर भारताची दक्षिण कोरियासोबत सुद्धा टक्कर होईल.

2023 मध्ये पाकिस्तानची फुटबॉल टीम भारतात दक्षिण आशिया चॅम्पियनशीप खेळली. तर भारतीय खेळाडू डेव्हिस कपसाठी इस्लामाबाद येथे गेले होते. पण नुकत्याच झालेल्या आयसीसी सामन्यात भारतीय संघाचे सामने पाकिस्तानात खेळवण्यात आले नव्हते, हे विशेष. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला होता.

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?