AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचे ढग गडद…कोणाची किती लष्करी ताकद?

India -Pakistan Military : पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणल्या गेले आहे. भारताने कायदेशीर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्ताने सुद्धा नुकतीच तीच री ओढली आहे. लष्करी आणि संरक्षण दृष्ट्या कोणता देश बलशाली आहे?

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचे ढग गडद...कोणाची किती लष्करी ताकद?
India Pakistan WarImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Apr 24, 2025 | 6:05 PM
Share

पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारता काही तरी मोठं करण्याची धास्ती पाकिस्तानला वाटत आहे. तर दुसरीकडे रशियाच्या माध्यमांनी सुद्धा भारत मोठं पाऊल टाकण्याची शक्यता वर्तवली आहे. पाकिस्तानने पाक व्याप्त काश्मीरसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणल्या गेले आहे. भारताने कायदेशीर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्ताने सुद्धा नुकतीच तीच री ओढली आहे. लष्करी आणि संरक्षण दृष्ट्या कोणता देश बलशाली आहे?

भारतीय लष्कर मजबूत

जगभरातील लष्कराची ताकद किती याची पाहणी करणाऱ्या ग्लोबल फायरपॉवरने 2025 साठी नवीन श्रेणी तयार केली आहे. या रँकिंगमध्ये भारत जगातील चौथी सर्वात मोठी लष्करी ताकद असल्याचे म्हटले आहे. तर पाकिस्तान क्रमवारीत 12 व्या क्रमांकावर आहे. भारताची सैन्य ताकद पाकिस्तानपेक्षा सरस आणि अधिक आहे हे निर्विवाद सत्य आहे. या इंडेक्समध्ये, क्रमवारीतेत पाकिस्तान पूर्वी 7 व्या क्रमांकावर होता. पण या वर्षाच्या सुरुवातीलाच या देशाची आर्थिक स्थिती आणि लष्कारासाठी निधी अपुरा पडत असल्याच्या कारणाने त्याला टॉप 10 मधून कमी करण्यात आले. तर भारत यादीत चौथ्या स्थानावर आहे.

भारताने संरक्षणावरील खर्चासाठी अर्थसंकल्पात 2025-26 साठी 6.8 लाख कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही रक्कम 9.5% पेक्षा अधिक आहे. पाकिस्तानने संरक्षणासाठी अर्थसंकल्पात 2,281 अब्ज रुपयांची तरतूद केली आहे. त्यांनी गेल्यावर्षीपेक्षा या खर्चात 159 अब्ज रुपयांची वाढ केली आहे.

लष्करी शक्ती : संख्यात्मक तुलना

सैनिकांची संख्या पाहता भारताकडे 14.55 लाख सक्रिय सैनिक आहेत. तर भारताकडे राखीव सैनिकांची संख्या 11.55 लाखांच्या जवळपास आहे. पाकिस्तानकडे तुलनेने केवळ 6.54 सक्रिय सैनिक आहेत आणि राखीव सैनिकांची तुकडी 5.5 लाख इतकी आहे.

भारताकडे अर्धसैनिकांची संख्या जवळपास 25.27 लाखांच्या जवळपास आहे. तर पाकिस्तानकडे ही संख्या 5 लाख इतकीच आहे. भारताकडे संख्याच नाही तर त्यांचे प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान पण प्रगत आहे.

लष्कर : टँक आणि तोफखान्यात भारताची आघाडी

भारताकडे 4,201 टँक आहे. यामध्ये T-90 भिष्म आणि अर्जुन सारखे अत्याधुनिक रणगाडे आहेत. त पाकिस्तानकडे ही संख्या 2,627 टँक इतकी आहे. यामध्ये अल-खालिद, T-80UD आणि अल-जर्रार यांचा समावेश आहे. भारताकडे 1,48,594 चिलखती वाहनं आहेत. तर पाकिस्तानकडील ही संख्या तोकडी आहे. तर स्वयंचलित तोफखाना प्रणालीत पाकिस्तान भारतापेक्षा उजवा आहे.

हवाईदल : संख्या आणि गुणवत्तेत भारत अग्रेसर

भारताकडे एकूण 2,229 लष्करी विमानं आहेत. तर पाकिस्तानकडे ही संख्या 1 हजार 399 इतकी आहे. भारताकडे लढाई विमानांची संख्या 513 इतकी तर पाकिस्तानकडे हीच संख्या 328 इतकी आहे. एअरटँक्सचा विचार करता भारताकडे ही संख्या 6 आणि पाकिस्तानकडे 4 इतकी आहे. भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यात सुखोई, राफेल, मिराज सारखे आधुनिक फाईटर जेट्स सहभाग आहे. तर पाकिस्तानकडे JF-17 थंडर, F-16 आणि मिराज यांचा समावेश आहे.

नौदल : ‘ब्लू वॉटर’ विरुद्ध ‘ग्रीन वॉटर’

भारताकडे दोन विमानवाहू INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत ही जहाजं आहेत. 293 जहाज संख्येसह भारताची नौसना, पाकिस्तानपेक्षा खूप मोठी आणि अत्याधुनिक आहे. भारताकडे 18 पाणबुड्या तर पाकिस्तानकडे 8 पाणबुड्या आहेत. पाकिस्तानकडे एकही विमानवाहू जहाज नाही.

दोन्ही देश अणवस्त्र सज्ज

पाकिस्ताकडे अंदाजे 150 हून अधिक अणवस्त्र आहेत. तर भारताकडे एक व्यवस्थित न्युक्लिअर शील्ड आहे. दोन्ही देशांनी ‘No First Use’ हे धोरण स्वीकारले आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?