भारताने हल्ला करण्यापूर्वीच पाकिस्तान घाबरला? जाहीर केला 12 दिवसांचा लॉकडाऊन

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कोणतीही लष्करी कारवाई झाली नाही, तरीही पाकिस्तानात इतकी भीती पसरली आहे की तिथल्या अनेक भागांत खबरदारी म्हणून कठोर पावले उचलली जात आहेत. आता तिकडे लॉकडाऊन घोषित केला आहे.

भारताने हल्ला करण्यापूर्वीच पाकिस्तान घाबरला? जाहीर केला 12 दिवसांचा लॉकडाऊन
Pakistan Lockdown
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 02, 2025 | 1:12 PM

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. भारताकडून अद्याप कोणतीही लष्करी कारवाई झालेली नाही, परंतु पाकिस्तानच्या विविध भागांत भीतीचे वातावरण स्पष्टपणे दिसत आहे. एकीकडे कराचीत कलम 144 लागू करण्यात आले आहे, तर आता खैबर जिल्ह्यातील जमरूद भागात 12 दिवसांचा स्मार्ट लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन का जारी करण्यात आला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामागचे कारण मंकीपॉक्सचा एक रुग्ण सापडल्याचे सांगितले जात असले, तरी हा लॉकडाऊन लागू करण्याचा काळ केवळ योगायोग नाही. उपायुक्त कॅप्टन (निवृत्त) बिलाल शाहिद राव यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, या काळात या भागात लोकांची ये-जा पूर्णपणे बंद राहील.

वाचा: भारतासोबत युद्ध होणार असल्याचे कळताच पाकिस्तानी नागरिकांचा आनंद गगनात मावेना, कारण वाचून व्हाल थक्क

ये-जा करण्यावर पूर्णपणे निर्बंध

पाकिस्तानच्या खैबर जिल्ह्यातील जमरूद भागातील ‘पंप हाउस गुंडी मोहल्ला’ येथे मंकीपॉक्सचा एक रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने संपूर्ण मोहल्ल्यात 12 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. जरी स्थानिक प्रशासन याला आरोग्याच्या कारणास्तव घेतलेला निर्णय सांगत असले, तरी तज्ज्ञांचे मत आहे की भारताकडून संभाव्य प्रत्युत्तर कारवाईच्या भीतीमुळे पाकिस्तानच्या संवेदनशील भागांत आधीच सतर्कतेच्या मोडवर कारवाई केली जात आहे.

कोणत्या गोष्टींना सूट मिळाली?

लॉकडाऊनदरम्यान काही अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. यामध्ये किराणा दुकाने, औषधांची दुकाने, जनरल स्टोअर्स, तंदूर आणि आपत्कालीन सेवा यांचा समावेश आहे. याशिवाय इतर सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील. जमरूदचे सहायक आयुक्त आणि खैबर पोलिसांना लॉकडाऊन काटेकोरपणे लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, नियम तोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भारताच्या मौनामुळे पाकिस्तानात अस्वस्थता

पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून अद्याप कोणतेही लष्करी पाऊल उचलले गेले नसले, तरी पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा विविध भागांत सतर्क आहेत. कराचीत आधीच कलम 144 लागू झाले आहे, तर आता खैबरसारख्या भागांतही प्रशासकीय कठोरता दिसत आहे. म्हणजेच भारताची कारवाई अद्याप झाली नसली, तरी त्याची भीती पाकिस्तानात लॉकडाऊनच्या रूपात दिसू लागली आहे.