भारतासोबत युद्ध होणार असल्याचे कळताच पाकिस्तानी नागरिकांचा आनंद गगनात मावेना, कारण वाचून व्हाल थक्क
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर पावलांमुळे पाकिस्तानीची चिंता वाढली आहे. मात्र, पाकिस्तानी नागरिकांनी स्वतःची खिल्ली उडवणाऱ्या मिम्सचा पूर आणला, जो सिंधू नदीपेक्षाही वेगाने पसरला. पाण्याच्या टंचाईपासून ते संपूर्ण ब्लॅकआऊटपर्यंत, भारताच्या उपाययोजनांमुळे येणाऱ्या संभाव्य परिणामांची पाकिस्तानी नागरिकांनी कल्पना केली.

काश्मीरमधील पहलगाम येथील 26 पर्यटकांची हत्या झाल्यानंतर भारताने तातडीने अनेक उपाययोजना जाहीर केल्या, ज्यात सिंधू जल करार निलंबित करणे, व्हिसा निलंबन आणि राजनैतिक संबंध कमी करणे यांचा समावेश आहे. सिंधू नदीवरील पाणी बंद करण्याचा निर्णय तात्काळ नसला तरी, त्याचे पाकिस्तानच्या शेती आणि ऊर्जा क्षेत्रावर मोठे परिणाम होऊ शकतात. कारण सिंधू नदी, जी पाकिस्तानची जीवनरेखा आहे, ती 80% शेतीच्या जमिनीला पाणी पुरवते. तसेच, पाकिस्तानच्या एक तृतीयांश जलविद्युत निर्मितीही सिंधू खोऱ्यातील पाण्यावर अवलंबून आहे.
मात्र, परिणामांबद्दल चिंता करण्याऐवजी, पाकिस्तानी नागरिकांनी मिम्स आणि उपहासाच्या माध्यमातून स्वतःच्या देशाची थट्टा केली आहे.
वाचा: ‘याचा अर्थ तुम्ही नालायक…’, पहलगाम हल्ल्यावर वक्तव्य करताना शाहिद आफ्रीदीने ओलांडल्या मर्यादा
एकाने मिम शेअर करत म्हटले की, आता पाकिस्तानींना आंघोळीसाठीही भारताकडे पाणी मागावे लागेल, तर दुसऱ्याने म्हटले की, भारताने हल्ला करू नये, कारण सरकारला अनेक देशांचे कर्ज फेडायचे आहे.
When you also wanna post some India vs Pakistan memes but then realise you’re Kashmiri : pic.twitter.com/gLAckgv0J0
— koshurpilled (@kashmirimutant) April 25, 2025
“आम्हाला अर्ध्या जगाचे कर्ज फेडायचे आहे, त्यामुळे भारतातून कोणालाही आमच्यावर हल्ला करू देऊ नका. सगळे झोपा,” असे एका एक्स युजरने, @ChilliButter, पोस्ट केले.
दुसऱ्याने विनोदीपणे म्हटले, “पाकिस्तानी सरकारला भारताने पाकिस्तान ताब्यात घ्यावे असे वाटते, जेणेकरून त्यांना लोकांवर पैसे खर्च करावे लागणार नाहीत आणि जगाकडून कर्जमाफी मागता येईल.”
Pakistan’s “digital terrorists” unleash their humour amid rising tensions between Pakistan and India. Here are some of the best memes 🧵 pic.twitter.com/Md2P02VYuI
— Bahaaristan (@Bahaaristanpk) April 24, 2025
कराचीतील वारंवारच्या ब्लॅकआऊटवर एका युजरने उपहासात्मक टिप्पणी केली. “ब्रेकिंग: कराचीत मोठा आवाज झाल्यानंतर पूर्ण ब्लॅकआऊट, ही सुरुवात आहे का… सॉरी, आमच्या मोहल्ल्यातला ट्रान्सफॉर्मर उडाला,” असे त्याने ट्वीट केले. दुसऱ्याने त्याला पाठिंबा देत म्हटले, “हा तर कराचीत रोजचा प्रकार आहे.”
Pakistan’s meme game is on point. Even in this time of distress , they r trying to create this space little light 😁 Hum Indians isme haar jayenge unse pakka. pic.twitter.com/M9DiKrfDU5
— Mann मन من ਮੰਨ (@kitabbaazi) April 25, 2025
पाकिस्तानात वीज खंडित होणे ही नागरिकांसाठी दीर्घकालीन समस्या बनली आहे, गेल्या अनेक वर्षांपासून देशाला वीज संकटाचा सामना करावा लागत आहे.
Pakistan vs India Memes are Super Funny 😂
Enjoy this thread🧵 pic.twitter.com/DmR7TYUixn
— Zahoor Akash ❤️ (@Zahoori65) April 26, 2025
Pakistan Takes the High Road: Citizens Respond to Rising Tensions with India through Humour and Memes 😂👀 #indiapakistan #memewars #IndiaEmptyThreats pic.twitter.com/ks6q3j4yHW
— sayyida bukhari (@syeda636) April 25, 2025
विजेशिवाय, पाकिस्तानला गॅस पुरवठ्यातील अनियमिततेचाही सामना करावा लागत आहे. “युद्ध करायचे असेल तर रात्री 9 वाजण्यापूर्वी करा. 9:15 नंतर गॅस जाते,” असे ‘अक्रमा’ नावाच्या युजरने ट्वीट केले. “त्यांना कळले पाहिजे की ते कोणत्या गरीब देशाशी भांडत आहेत,” असे त्याने पुढे म्हटले. दुसऱ्याने मिश्किलपणे म्हटले, “सुरक्षा कारणांमुळे पाकिस्तान-भारत युद्ध दुबईत व्हायला हवे.”
