Explainer : बांगलादेशचे भवितव्य काय? ड्रॅगनच्या विळख्यात अडकणार की भारताशी जवळीक फायद्याची; रहमान यांच्या सत्तेत काय होणार?
बांगलादेशमध्ये बीएनपी या पक्षाची सत्ता आली आहे. तेथे तारिक रहमान हे पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. त्यामुळे आता भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांचे संबंध भविष्यात कसे असतील, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

Bangladesh India Relations : बांगलादेशात नुकतेच सार्वत्रिक निवडणूक झाली. या 13 लोकसभा निवडणुकीत बांगलादेशात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात बीएनपी या पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला. या पक्षाला 299 पैकी साधारण 212 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच या पक्षाने तेथे एकहाती सत्ता मिळवली आहे. साधारण वीस वर्षांनी हा पक्ष सत्तेत आला आहे. आता ठरल्यानुसार तेथे बीएनपी पक्षाचे नेतेत तारिक रहमान हे बांगलादेशचे नवे पंतप३धान होणार आहेत. ते बीएनपी पक्षाच्या प्रमुखपदी तसेच माजी पंतप्रधान असलेल्या खालिदा जिया यांचे सुपुत्र आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनामुळे शेख हसिना यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर निवडणुका झाल्या आहेत. असे असतानाच आता तारिक रहमान हे बांगलादेशचे नवे पंतप्रधान होणार असले तरीही त्यांची रणनीती काय असेल? ते भविष्यात चीन आणि पाकिस्तानच्या प्रभावाखाली राहून भारतविरोधी निर्णय घेतील की भारताशी सलगी वाढवून शांतता आणि विकासाच्या यात्रेत सहभागी होतील? असे विचारले जात आहे. रहमान पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नेमकं काय होणार? भारताला नेमका काय फटका बसू शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून...
