AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतानं नाक दाबताच पाकिस्ताननं तोंड उघडलं; शहबाज शरीफ यांचं पहलगाम हल्ल्यावर मोठं वक्तव्य

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानवर दबाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

भारतानं नाक दाबताच पाकिस्ताननं तोंड उघडलं; शहबाज शरीफ यांचं पहलगाम हल्ल्यावर मोठं वक्तव्य
Shehbaz SharifImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 26, 2025 | 3:40 PM
Share

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. सिंधु नदीच्या पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे, तसेच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, यामुळे पाकिस्तानवर मोठा दबाव निर्माण झाला आहे, त्यामुळे आता पाकिस्तानचा सूर नरमला आहे. पहलगामवर जो हल्ला झाला, त्याच्या निष्पक्षपाती आणि तटस्थ चौकशीसाठी आम्ही भारताला पूर्णपणे सहकार्य करू, असं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे. ते खैबर -पख्तूनख्वामधल्या काकुल येथे पाकिस्तानी सैन्य आकादमीच्या पासिंग आउट परेडमध्ये बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, पहलगाममध्ये घडलेली दुर्घटना ही सततच्या आरोप-प्रत्यारोपाच्या खेळाचे आणखी एक उदाहरण आहे, जी थांबवली पाहिजे. एक जबाबदार देश म्हणून आपली भूमिका कायम ठेवत, पाकिस्तान कोणत्याही निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे. मात्र त्यासोबतच त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, भारताने जर आमच्या वाट्याचं पाणी थांबवलं तर आम्ही प्रत्येक पर्यायाचा अवलंब करू, कारण हे पाणी म्हणजे आमच्या देशाची जीवन रेखा आहे. आम्ही त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यासाठी तयार आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या राष्ट्रहिताचे संरक्षण करू, आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेनं याचं प्रत्युत्तर देऊ, असं शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे.

अशा परिस्थितीमध्ये शांतता ठेवणे हीच आमची प्राथमिकता आहे. पाकिस्तान कोणत्याही निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे. मात्र आम्ही आमची सुरक्षा आणि अखंडता याबाबत कधीच तडजोड करणार नाहीत. कोणतेही खोटे आरोप करू नयेत, आमच्या देशाच्या सार्वभौमत्त्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यास आम्ही सक्षम आहोत. जर सिंधू नदीचे पाणी बंद करण्याचा किंवा वळवण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण ताकदीनं प्रत्युत्तर देऊ, आमची सशस्त्र सेना तयार आहे, असं शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे.

Follow Us
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.