AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतानं नाक दाबताच पाकिस्ताननं तोंड उघडलं; शहबाज शरीफ यांचं पहलगाम हल्ल्यावर मोठं वक्तव्य

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानवर दबाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

भारतानं नाक दाबताच पाकिस्ताननं तोंड उघडलं; शहबाज शरीफ यांचं पहलगाम हल्ल्यावर मोठं वक्तव्य
Shehbaz SharifImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 26, 2025 | 3:40 PM
Share

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. सिंधु नदीच्या पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे, तसेच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, यामुळे पाकिस्तानवर मोठा दबाव निर्माण झाला आहे, त्यामुळे आता पाकिस्तानचा सूर नरमला आहे. पहलगामवर जो हल्ला झाला, त्याच्या निष्पक्षपाती आणि तटस्थ चौकशीसाठी आम्ही भारताला पूर्णपणे सहकार्य करू, असं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे. ते खैबर -पख्तूनख्वामधल्या काकुल येथे पाकिस्तानी सैन्य आकादमीच्या पासिंग आउट परेडमध्ये बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, पहलगाममध्ये घडलेली दुर्घटना ही सततच्या आरोप-प्रत्यारोपाच्या खेळाचे आणखी एक उदाहरण आहे, जी थांबवली पाहिजे. एक जबाबदार देश म्हणून आपली भूमिका कायम ठेवत, पाकिस्तान कोणत्याही निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे. मात्र त्यासोबतच त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, भारताने जर आमच्या वाट्याचं पाणी थांबवलं तर आम्ही प्रत्येक पर्यायाचा अवलंब करू, कारण हे पाणी म्हणजे आमच्या देशाची जीवन रेखा आहे. आम्ही त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यासाठी तयार आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या राष्ट्रहिताचे संरक्षण करू, आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेनं याचं प्रत्युत्तर देऊ, असं शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे.

अशा परिस्थितीमध्ये शांतता ठेवणे हीच आमची प्राथमिकता आहे. पाकिस्तान कोणत्याही निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे. मात्र आम्ही आमची सुरक्षा आणि अखंडता याबाबत कधीच तडजोड करणार नाहीत. कोणतेही खोटे आरोप करू नयेत, आमच्या देशाच्या सार्वभौमत्त्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यास आम्ही सक्षम आहोत. जर सिंधू नदीचे पाणी बंद करण्याचा किंवा वळवण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण ताकदीनं प्रत्युत्तर देऊ, आमची सशस्त्र सेना तयार आहे, असं शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.