AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Plane Crash : ‘आम्हाला 1 कोटी नकोत…आमचे पापा हवेत, मीच तुम्हाला 2 कोटी…,’ फाल्गुनीच्या सवालाने यंत्रणा हादरली..

तुम्ही सुरक्षितपणे उड्डाण करू शकत नसाल तर एअर इंडिया बंद करुन टाका... हा काही जोक नाही. एखाद्याच्या जीवापेक्षा जगात काहीही महत्त्वाचे नसते असा जळजळीत सवाल फाल्गुनी हिने करुन सर्वांनाच अंतर्मुख केले आहे.

Plane Crash : 'आम्हाला 1 कोटी नकोत...आमचे पापा हवेत, मीच तुम्हाला 2 कोटी...,' फाल्गुनीच्या सवालाने यंत्रणा हादरली..
| Updated on: Jun 13, 2025 | 4:35 PM
Share

‘जर तुम्ही आम्हाला एक कोटी देऊ इच्छीत आहात तर, मी तुम्हाला दोन कोटी देते, फक्त मला माझे पापा परत करा…,’ या शब्दात फाल्गुनी हिने प्रशासनाला खडसावले आहे. माझ्या वडिलांना परत करा असा टाहो फाल्गुनी हीने केला आहे. फाल्गुनी हिने तिच्या भावना एका खाजगी चॅनलशी बोलताना व्यक्त केल्या. फाल्गुनी हीच्या आवाजातील दु:ख , राग, एका मुलीचे पित्याबद्दलचे प्रेम व्यक्त होत आहे.

पापांची काय चुकी ?

फाल्गुनी हीने सवाल केला की कोणी सांगावे माझ्या पापाची काय चूक आहे. की त्यांनी हे फ्लाईट पकडले. मी मुलगी आहे. मला माझे पापा परत करा. एअर इंडियाने काय अवहेलना केलीय, काहीच उत्तर नाही, त्यांना काही संवेदनशीलता आहे की नाही असा सवालच फाल्गुनी हिने केला आहे.

पैसा नको तुमचा , माझे पापा मला परत करा

आम्हाला एक कोटी देण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. मी तु्म्हाला दोन कोटी देते, परंतू माझ्या पापा मला परत कराल. पैशाने माणूस परत येतो काय ? आम्ही त्या पैशांतून पलंग खरेदी करु, परंतू त्यावर झोप कशी येईल.जे खरे प्रेम मला माझे पापा द्यायचे, ते कुठे मिळेल ? असा आर्त सवाल फाल्गुनी हीने केला आहे.

देशभक्तीचे बक्षीस म्हणून काय मिळाले?

फाल्गुनी पुढे म्हणते की माझे वडील देशभक्त होते. ते स्वतः एअर इंडियाचा प्रवास अभिमानाने करायचे. ते नेहमी म्हणायचे, एअर इंडियाचा आम्हाला अभिमान वाटतो. तो देशाचा अभिमान आहे. पण, माझ्या वडिलांना त्यांच्या देशभक्तीचे बक्षीस म्हणून काय मिळाले? देशाचे नाव असे चालवायचे आहे का? जर तुम्ही सुरक्षितपणे उड्डाण करू शकत नसाल तर एअर इंडिया बंद करुन टाका. हा काही विनोद नाही. एखाद्याच्या जीवापेक्षा जगात काहीही महत्त्वाचे नसते असा जळजळीत सवाल फाल्गुनी हिने करुन सर्वांनाच अंतर्मुख केले आहे.

260  जणांचा मृत्यू

एअर इंडियाच्या सर्वात विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या ड्रीमलायनर या विमानाला काल दुपारी अहमदाबाद येथून टेक ऑफ घेत असताना ते हॉस्टेलवर कोसळल्याने विमानातील 242 प्रवाशांसही हॉस्टेलच्या 12 जणांचा बळी गेला आहे. या प्रकरणानंतर आता एअर इंडियाने मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या वारसांना एक कोटीची मदत जाहीर केलेली आहे. या विमानाच्या अपघाताला देशातील सर्वात मोठा विमान अपघात म्हटला जात आहे. या प्रकरणातील मृतांची ओळख पटवण्यासाठी 200 हून अधिक जणांच्या डीएनए टेस्ट घेण्यात येत आहेत.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत