पंतप्रधानांचा पत्ता बदलला, नव्या ठिकाणी काय घेतला मोठा निर्णय?

PM Modi : आजपासून पंतप्रधान मोदी नवीन पंतप्रधान कार्यालयात, "सेवा तीर्थ" मध्ये स्थलांतरित झाले आहेत. या इमारतीत जाताच मोदींना मोठा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधानांचा पत्ता बदलला, नव्या ठिकाणी काय घेतला मोठा निर्णय?
PM Modi new Office
Image Credit source: X
| Updated on: Feb 13, 2026 | 4:16 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) सेवा तीर्थाचे उद्घाटन केले. आजपासून पंतप्रधान मोदी नवीन पंतप्रधान कार्यालयात, “सेवा तीर्थ” मध्ये स्थलांतरित झाले आहेत. आज दुपारी 1:30 वाजता, पंतप्रधान मोदींनी “सेवा तीर्थ” इमारत संकुलाचे नाव अनावरण केले. या संकुलात पंतप्रधान कार्यालय (पीएमओ), राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (एनएससीएस) आणि कॅबिनेट सचिवालय आहे. या संकुलात येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पंतप्रधानांचे मोठे निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा तीर्थवरून लखपती दीदी योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पीएम राहत योजनेअंतर्गत लखपती दीदींचे उद्दिष्ट दुप्पट करून 6 कोटी करण्यात आले आहे. तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी दुप्पट करून 2 लाख कोटी करण्यात आला. 10 हजार कोटी रुपयांच्या निधीसह स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 सुरू करण्यात आला आहे. पीएम मोदींने घेतलेले महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे.

पंतप्रधान राहत योजना: प्रत्येक नागरिकासाठी जीवनरक्षक सुरक्षा

पंतप्रधानांनी पंतप्रधान राहत योजनेला मान्यता दिली आहे. या उपक्रमांतर्गत अपघातग्रस्तांना 1.5 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मिळणार आहेत. यामुळे त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध होणार असल्याने अनेकांचा जीव वाचणार आहे.

शेतकऱ्यांना मोठी मदत

कृषी पायाभूत सुविधा निधी दुप्पट करून 2 लाख कोटी रुपये करण्यात आला आहे. भारताची संपूर्ण कृषी मूल्य साखळी मजबूत करण्याच्या उद्देशाने हा खर्च 1 लाख कोटी रुपयांवरून 2 लाख कोटी रुपयांपर्यंत दुप्पट करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0, निधी 10 हजार कोटी रुपये .

भारताच्या स्टार्टअप इंडिया या नाविन्यपूर्ण परिसंस्थेला पंतप्रधानांनी 10000 कोटी रुपयांच्या निधीसह स्टार्टअप इंडिया एफओएफ 2.0 ला मंजुरी दिली आहे.

देखभाल खर्चात वाढ

गेल्या काही दशकांपासून, अनेक मंत्रालये जुन्या कार्यालयांमधून काम करत होती, ज्यामुळे समन्वय समस्या, देखभाल खर्चात वाढ आणि कार्यक्षमता कमी झाली होती. मात्र आता अनेक मंत्रायले नवीन संकुलात हलवण्यात आली आहेत. यामुळे कामे सुलभ होणार आहेत. सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन या दोन्ही ठिकाणी प्रशासकीय कार्यक्षमता आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी डिजिटली अपडेटेड कार्यालये तयार करण्यात आली आहेत. ज्यामुळे सर्वांना फायदा होणार आहे.