AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL 1st Test: श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान, टीम इंडियाच्या फिरकीची जबाबदारी वाढली

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. दुसऱ्या डावात भारतीय संघ धावांवर बाद झाला. त्यामुळे श्रीलंकेसमोर आता विजयासाठी धावांचं आव्हान आहे. आता भारतीय गोलंदाजांचा कस लागणार आहे. खासकरून फिरकी गोलंदाजांवरील जबाबदारी वाढली आहे.

IND vs SL 1st Test: श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान, टीम इंडियाच्या फिरकीची जबाबदारी वाढली
IND vs SL 1st Test: श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान, टीम इंडियाच्या फिरकीची जबाबदारी वाढलीImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 18, 2026 | 2:40 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात सुरू आहे. हा सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पहिल्या डावात भारताने प्रथम फलंदाजी करून 462 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 284 धावांवर आटोपला होता. त्यामुळे पहिल्या डावात 178 धावांची मोठी आघाडी टीम इंडियाला मिळाली होती. दुसऱ्या डावात भारताने 200 पार धावा करण्याची अपेक्षा होती. पण खेळपट्टी पूर्णपणे फिरकीला मदत करणारी असल्याने हे गणित कठीण असल्याचं दिसून आलं. भारताचा दुसऱ्या इनिंगमधील डाव अवघ्या 193 धावांवर आटोपला. या सामन्यातील दुसऱ्या डावात केएल राहुल, देवदत्त पडिक्कल आणि ऋषभ पंत वगळता सर्वांनी निराशा केली. भारताने 371 धावांचं ठेवलेलं आव्हान तसं पाहिलं तर सोपं नाही. पण भारतीय गोलंदाजांना आता भूमिका बजवावी लागणार आहे.

दुसऱ्या डावात 178 धावांच्या आघाडीच्या पुढे खेळताना भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने पहिल्याच षटकात विकेट दिली. त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरला. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. केएल राहुल 35 धावा करून बाद झाला आणि गणित बिघडलं. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शुबमन गिल 8 धावाच करू शकला. देवदत्त पडिक्कलचा डावही 44 धावांवर आटोपला. पण पहिल्या डावात फेल गेलेल्या ऋषभ पंतने दुसऱ्या डावात झुंजार खेळी केली. त्याने 69 चेंडूत 66 धावा केल्या आणि बाद झाला.

ऋषभ पंत बाद झाल्यानंतर खालच्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. ध्रुव जुरेल 7, रवींद्र जडेजा 9, मानव सुथार 9, कुलदीप यादव 5 धावा करून बाद झाले. त्यामुळे भारताची नाजूक स्थिती झाली. प्रसिद्ध कृष्णा 2 धावा करून बाद झाला आणि भारताचा डाव 193 धावांवर आटोपला. आता भारतीय फिरकीची जबाबदारी वाढली आहे. दीड दिवसांचा खेळ शिल्लक असून श्रीलंकेला विजयी धावांच्या आता गुंडाळण्याचं आव्हान असणार आहे. जर तसं झालं तर भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीच्या आशा जिवंत राहतील.

Follow Us
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात
अभिजीत दिपके यांच्या ठीक करो स्कूल अभियानाला गती
अभिजीत दीपकेंच्या स्कूल अभियानाला गती, मागण्या पूर्ण
बर्णे यांची सरकार, निवडणूक आयोगावर बौद्धिक नक्षलवादावरून टीका
बौद्धिक नक्षलवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर श्यामकुमार बर्णे यांची टीका
चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात जालन्यात मुंडन आंदोलन
जालन्यात भीमशक्ती संघटनेचे मुंडन आंदोलन
मनोज जरांगेंकडून आंदोलनासाठी कायदेशीर प्रक्रिया, थेट पोलिसांना अर्ज अन
मनोज जरांगेंकडून आंदोलनासाठी कायदेशीर प्रक्रिया, थेट पोलिसांना अर्ज अन् आझाद मैदानावर...
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम...
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम सरोदंचं मोठं विधान, काय म्हणाले?