‘यांचा’ विषयच हार्ड आहे; विश्वगुरू म्हणतात, नोकरीसाठी पदवीची गरजच नाही…
वकांनी कौशल्य विकासाचे महत्व ओळखून त्यातही पारंगत होणं गरजेचं आहे. भविष्यात, जर विद्यार्थ्याकडे कोणतीही पदवी नसेल, परंतु काही कौशल्य असली तरी ती पुरेशी आहेत.
अहमदाबादः सध्या बेरोजगारीवरुन सरकारला घेरले जात असतानाच नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) शिक्षण आणि पदवीबद्दल जाहीर वक्तव्य केल्यामुळे आता त्याच वाक्याची जोरदार चर्चा सुरू आहे. रोजगारावरुन सुरू असलेल्या वादावरुन उमेदवारांनी शिक्षित असणे गरजेचे आहे असं म्हणतात. असंही म्हटलं जातं की, ज्यांच्याकडे अभ्यास आणि चांगली पदवी (Degree) आहे. त्यांनाच चांगल्या संस्थेत आणि भरभक्कम पदावर नोकरी मिळते. एकीकडे याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक विधान चर्चेत आले आहे.
अहमदाबादजवळ (Ahmedabad) एका शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, भविष्यात एखाद्या विद्यार्थ्याकडे पदवी नसली तरी चालतील मात्र त्यांच्याकडे काही कौशल्ये असतील तर त्यांना चांगली नोकरी मिळू शकते असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.
पंतप्रधान मोदी गेल्या रविवारपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातमधील छरोडी, अहमदाबादजवळ मोड वनिक मोदी समाजाने मोदी शैक्षणिक संकुलाची स्थापना केली आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, जो समाज शिक्षणावर लक्ष केंद्रित करतो तोच समाज यशस्वी होतो. तरुणांसाठी शिक्षण अधिक सुलभ करण्याच्या मार्गांवरही लक्ष केंद्रित करणे हा यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग असल्याचेही त्यांनी सांगितले. आमच्या लोकांना उशीर झाला असला तरी आम्ही योग्य मार्गावर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गुजरातमध्ये बोलताना ते म्हणाले की, अधिक संख्येने तरुण वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर विषयांकडे लक्ष केंद्रित करत आहेत.
मात्र युवकांनी कौशल्य विकासाचे महत्व ओळखून त्यातही पारंगत होणं गरजेचं आहे. भविष्यात, जर विद्यार्थ्याकडे कोणतीही पदवी नसेल, परंतु काही कौशल्य असली तरी ती पुरेशी आहेत.
गुजरातमधील ज्या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदींनी हजेरी लावली त्या मंचावर त्यांचे मोठे भाऊ सोमाभाई मोदी उपस्थित होते. ते त्यांच्या समाजातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत.