PM मोदींची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक! कामगिरीचा हिशोब होणार; मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेनंतर घडामोडी वाढल्या!

PM Modi Review Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सायंकाळी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत विविध मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे.

PM मोदींची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक! कामगिरीचा हिशोब होणार; मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेनंतर घडामोडी वाढल्या!
pm modi review meeting
Image Credit source: Google
| Updated on: Sep 06, 2026 | 5:11 PM

विविध मंत्रालयांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विशेषतः सामाजिक न्याय आणि सामाजिक कल्याण क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सायंकाळी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीत विविध मंत्रालये, मंत्री आणि त्यांच्या एकूण कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार आहे. या आढावा बैठकीसाठी सामाजिक न्याय आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित मंत्रालयांचा कार्यभार असलेल्या काही निवडक राज्यमंत्र्यांना (MoS) आणि स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांना बोलावण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्या मंत्रालयांच्या कामकाजाचा आढावा होणार?

उद्याच्या बैठकीत ज्या मंत्रालयांच्या कामकाजावर विशेष लक्ष दिले जाणार आहे, त्यामध्ये शिक्षण मंत्रालय, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, कृषी मंत्रालय यांसह अन्य संबंधित मंत्रालयांचा समावेश आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार असून, त्यांच्या जबाबदारीबाबतही चर्चा होणार आहे. येत्या काही दिवसांत राज्यमंत्र्यांच्या इतर गटांसोबतही अशाच प्रकारच्या बैठका होणार आहेत. या बैठकांचा संबंध राज्यमंत्र्यांच्या कामगिरीशी जोडला जात असून, भविष्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदलाच्या वेळी अशा प्रकारच्या कामगिरीच्या आढाव्याची प्रक्रिया यापूर्वीही होत आली आहे.

कामांचा सातत्याने आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये जलशक्ती मंत्रालयाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय शिखर परिषदेच्या समारोप सत्राचे अध्यक्षस्थान भूषवले होते. यावेळी त्यांनी परिषदेत मांडण्यात आलेल्या सूचनांची ठरावीक वेळेत अंमलबजावणी करण्यात यावी, असे सांगितले होते. तसेच, या कामांचा सातत्याने आढावा घेण्याची गरज असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले होते. यामुळे आवश्यकतेनुसार सुधारणा करता येतील, असे त्यांनी म्हटले होते.

शहरांची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची वाढती गरज यांसारख्या आव्हानांबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना सजग करण्याची गरज असल्याचेही मोदी यांनी सांगितले. शहरी भागातील पाण्याची गरज लक्षात घेऊन अधिक चांगले नियोजन आणि तयारी करण्यावर त्यांनी भर दिला.पाणी बचतीच्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन**ही पंतप्रधानांनी केले. भारतीय उत्पादक आणि संबंधित क्षेत्रातील व्यक्तींना अधिक प्रभावी आणि परिणामकारक उपाय विकसित करण्यासाठी तसेच ते मोठ्या प्रमाणावर लागू करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने विशेष प्रदर्शन आणि कार्यशाळा आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us