‘पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द होण्याचं कारण रिकाम्या खुर्च्या होतं’, काँग्रेसचा पलटवार, सुरजेवालांनी व्हिडीओही दाखवला!

| Updated on: Jan 05, 2022 | 5:31 PM

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंजाब सरकार आणि काँग्रेसवर जोरदार टीका केलीय. तर नड्डा यांच्या टीकेला आता काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. काँग्रेस नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द होण्याचं कारण रिकाम्या खुर्च्या होतं, काँग्रेसचा पलटवार, सुरजेवालांनी व्हिडीओही दाखवला!
रणदीप सुरजेवाला, जे. पी. नड्डा
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपला पंजाब दौरा अचानक रद्द केल्यानं राष्ट्रीय राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पंतप्रधान मोदी हे पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. या प्रकारानंतर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनी पंजाब सरकार आणि काँग्रेसवर जोरदार टीका केलीय. तर नड्डा यांच्या टीकेला आता काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. काँग्रेस नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

‘प्रिय नड्डाजी, पंतप्रधान मोदी यांची रॅली रद्द होण्यामागे मुख्य कारण हे रिकाम्या खुर्च्या होतं. विश्वास बसत नसेल तर हे पाहा. अर्थहीन भाषणबाजी नको. शेतकरी विरोधी मानसिकतेचं सत्य स्विकारा आणि आत्मचिंतन करा. पंजाबमधील जनतेनं रॅलीपासून दूर राहत अहंकारी सत्तेला आरसा दाखवला आहे’, अशी घणाघाती टीका सुरजेवाला यांनी केलीय.

पंजाबमध्ये नेमकं काय घडलं?

पंतप्रधान मोदी हे आज पंजाब दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचा ताफा द्या मार्गावरुन जाणार असतो तो मार्ग पूर्ण रिकामा करण्यात येतो. मात्र, पंतप्रधान मोदींच्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक आंदोलन करत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे मोदींना काही वेळ आपल्या गाडीतच थांबून राहावं लागलं. त्यानंतर मोदींनी आपल्या पंजाब दौरा रद्द करत ते पुन्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ‘आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमातळावर जिवंत पोहोचू शकलो’, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी संताप व्यक्त केल्याचं समजतं.

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांची टीका

‘पंजाब सरकारने दाखवून दिलं की ते विकासविरोधी आहेत आणि आपल्या स्वातंत्र्यसेनानींबद्दल त्यांच्या मनात आदर नाही. ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील एक मोठी चूक होती. हे खूप चिंताजनक आहे. पंतप्रधान मोदी हे देशाचे सुपुत्र सरदार भगतसिंह आणि अन्य शहीदांना श्रद्धांजली अर्पण करणार होते. सोबतच राज्यातील प्रमुख विकासकामांचं भूमिपूजन ते करणार होते’.

‘पंजाबमधील काँग्रेस सरकारनं आगामी विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या पराभवाच्या भीतीने देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रम होऊ न देण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेशी तडजोड करण्यात आली’, असा गंभीर आरोप नड्डा यांनी आपल्या ट्वीटद्वारे केलाय.

इतर बातम्या : 

VIDEO: दोन-चार पादरेपावटे फुसफुसले म्हणजे सरकारला आग लागत नाही, राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल

Chemical fertilizer : रब्बी हंगामात दुहेरी संकट, रासायनिक खतांच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी हतबल