AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन वर्षाची सुरुवात पावसाच्या संकटाने, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत या पाऊस

Rain Update | यंदा पावसावर अल निनोचा प्रभाव होता. यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस महाराष्ट्रात आणि देशातील काही भागांत झाला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला. आता पुन्हा वर्षअखेर आणि नवीन वर्षांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

नवीन वर्षाची सुरुवात पावसाच्या संकटाने, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत या पाऊस
| Updated on: Dec 26, 2023 | 10:41 AM
Share

नवी दिल्ली, पुणे, दि.26 डिसेंबर | सन २०२३ संपण्यासाठी आता काही दिवस राहिले आहे. या वर्षभरात अवकाळी पाऊस आणि दुष्काळ यामुळे शेती आणि शेतकऱ्यांसाठी अनेक संकटे आली. या वर्षांत पावसावर अल निनोचा प्रभाव होता. यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस महाराष्ट्रात आणि देशातील काही भागांत झाला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला. आता पुन्हा वर्षअखेर आणि नवीन वर्षांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत पाऊस पडणार असल्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.

काय आहे हवामान विभागाचा अंदाज

३० डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान तामिळनाडूतील किनारपट्टीवरील भागांत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कमी पातळीच्या पूर्वेकडील वाऱ्यांमुळे जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग आणि दिल्ली आणि एनसीआरमध्ये पावसाची शक्यता आहे. डोंगराळ भागात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.

स्कायमेटकडून पावसाचा अंदाज

हवामाचा अभ्यास करणारी खासगी संस्था स्कायमेटकडून पावसाचा अंदाज आहे. ३० ते १ जानेवारी दरम्यान होणाऱ्या पावसामुळे सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागताचा आनंदावर पावसाचे विरजन पडणार आहे. पश्चिम वाऱ्यांमुळे वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पाऊस पडणार आहे.

रब्बी पिकाला बसणार फटका

अवकाळी पाऊस झाल्यास रब्बी पिकाला फटका बसणार आहे. यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे रब्बी पिकाची पेरणी कमी झाली आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्यात आलेला पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. तसेच यंदा थंडीही पडली नाही. त्याचा परिणाम रब्बी पिकावर होणार आहे. या सर्व संकटात अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे.

Follow Us
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.