AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जात-धर्म पाहून मुलाखत, देशात लाच घेऊनच नोकर भरती, रामदेव बाबांचा आंदोलनाचा इशारा

योगगुरू रामदेव बाबांनी सरकारी नोकरभरती प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, देशात ९९% सरकारी नोकऱ्यांमध्ये भ्रष्टाचार आणि घोटाळा होतो, जिथे जात, धर्म, वर्ग पाहून लोकांना नोकरी दिली जाते. लाचखोरीमुळे गुणवत्ता डावलली जात आहे. हे थांबले नाही, तर दुसऱ्यांदा मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

जात-धर्म पाहून मुलाखत, देशात लाच घेऊनच नोकर भरती, रामदेव बाबांचा आंदोलनाचा इशारा
Ramdev BabaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 15, 2026 | 1:09 PM
Share

देशात चोहोबाजूंनी हंगामा आहे. सरकारी नोकऱ्यांच्या मुलाखतीत मोठ्या प्रमाणावर गडबड होते. जात, धर्म, वर्ग, संघटनेच्या लोकांना फायदा देऊन इतरांना नोकरीपासून दूर केलं जात आहे. देशात सरकारी नोकऱ्यांमध्ये 99 टक्के घोटाळा आहे, असा खळबळजनक दावा करतानाच हे प्रकार बंद झाले पाहिजे. नाही तर मला दुसऱ्यांदा आंदोलन करावे लागेल, असा इशाराच योगगुरू बाबा रामदेव यांनी दिला आहे. जंतरमंतरवर झालेल्या जेनजी आंदोलनाच्या संदर्भाने रामदेव बाबा बोलत होते.

80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण केल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना रामदेव बाबांनी नोकर भरती प्रक्रियेवरच बोट ठेवलं. भरती प्रक्रियेत मुलाखतीच्या वेळी लाच आणि शिफारस केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये 90 ते 99 टक्के घोटाळा होतो. आपल्या जात, वर्ग, धर्म, समुदाय आणि विचारांच्या लोकांना नोकरी दिली जाते. इतरांना धक्का मारला जातो. हे सर्व अपमानजनक आहे आणि लोकशाहीच्या विरोधी आहे, असं रामदेव बाबांनी म्हटलंय.

आता तरी सुधरा…

देशात चाहोबाजूने हंगामा आहे. मुलं म्हणतात शाळेत शिक्षक नाहीत. वीज नाही, पाणी नाही, शौचालये नाहीत. कुठे कॉपी होते. काही ठिकाणी पेपर फुटतो. तर कुठे सरकारी नोकऱ्यांमध्ये 99 टक्के घोटाळा होतो, असं सांगतानाच आता तरी सुधरा. नाही तर अधिक आंदोलने होतील, असा इशारा त्यांनी दिला. तसेच देशात घोटाळे अधिक आहेत, असा दावाही त्यांनी केला.

भरतीचा खेळ सुरू

एकीकडे आपण सत्यमेव जयतेची घोषणा करतो. दुसरीकडे लाखो कोटी रुपये देऊन नोकऱ्या दिल्या जात आहे. जर देशात आंदोलने सुरू राहिली तर देश कसा चालेल? आता देशात सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 लाख ते एक कोटी रुपये देऊन भरतीचा खेळ सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

अराजकतेचं समर्थन नाही

आताही वेळ गेली नाही. सुधारलं पाहिजे. नाही तर देशात आणखी आंदोलने होतील. आंदोलनाच्या नावावर अराजकतेचं आम्ही समर्थन करणार नाही. तसं सहनही करणार नाही. पण देशात घोटाळे प्रचंड आहेत हे वास्तव आहे. हे घोटाळे बंद झाले पाहिजे. नाही तर मला दुसऱ्यांदा आंदोलन करावं लागेल, असा इशारा त्यांनी दिला. आज देश द्वेष आणि घृणेचं वातावरण तयार झालं आहे. देशातील संसदेत सत्ताधारी आणि विरोधक हे पाकिस्तान आणि भारतासारखे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत, असंही ते म्हणाले.

Follow Us
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण